सातारा जिल्ह्यात काँग्रेसची नव्याने बांधणी; तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी-आमदार मलेंद्र राजन
सातारा (प्रतिनिधी):सातारा जिल्ह्यात इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तालुका आणि गाव पातळीवर व्यापक मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत पक्षाचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.
पक्षाच्या तालुका अध्यक्ष व इतर निवडी लवकरच करण्यात येणार असून, तळागाळातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. संघटन मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवर अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.
या प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून हिमाचल प्रदेश चे आमदार मलेंद्र राजन , आ.अभिजित कदम आणि रणजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात संघटनात्मक बदल राबविले जाणार आहेत.यावेळी सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, “संगठन सृजन अभियान” या मोहिमेद्वारे काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण करण्याच्या तयारीत असून, गावागावात पक्षाची पकड मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.




