नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » किसन वीर व खंडाळा कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ बुधवारी

किसन वीर व खंडाळा कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ बुधवारी

किसन वीर व खंडाळा कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ बुधवारी

दि. ११/११/२४ : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार (दि. १३) रोजी होणार आहे. खंडाळा कारखान्याचा सकाळी १० वाजता तर किसन वीर कारखान्याचा दुपारी १ वाजता कार्यक्षेत्रातील पाच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, शासनाने राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्याबाबत सुचित केलेले होते. किसन वीर व खंडाळा कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे पुर्ण झालेली असून कारखाना गळितासाठी सज्ज झालेला आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्यावर ऊस तोडणी मजुरही दाखल झालेले आहेत. मागील दोन हंगाम आपण यशस्वीरित्या चालवुन शेतकरी व वाहन मालकांचे संपुर्ण पेमेंट अदा केल्यामुळे तसेच मागील संचालक मंडळाच्या काळातील सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बील ५४ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यामुळे कारखान्यावर विश्वास वाढलेला आहे. किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्याचे आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ संचालक मंडळाने डोळ्यासमोर ठेवलेले आहे. हा गळीत हंगाम शेतकरी व कामगारांच्या सांघिक प्रयत्नातुन यशस्वी करणार आहोत. या गळित हंगामातही एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम आपण देणार असून सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी कोणत्याची भुलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच गाळपासाठी देण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी केलेले आहे.

किसन वीर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket