जातीनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी: भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम
मोदींच्या अभिनंदनाचे ठराव भाजपा संपूर्ण सातारा जिल्ह्यात घेणार
जातनिहाय जनगणना करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी व ऐतिहासिक आहे भारतीय जनता पार्टीच्यावतीने पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा ठराव सर्व ग्रामपंचायती, बूथ व मंडलामध्ये घेण्याची तयारी करण्यात आली आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली
धैर्यशील कदम म्हणाले की विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिनाला घोषणा करताना भा ज पा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, या क्रांतिकारी निर्णयाबद्दल महाराष्ट्र भाजपाने राज्यातील एक लाख १८६ बूथ आणि १,२८० मंडल समित्यांसह महाराष्ट्रातील २७ हजार ग्रामपंचायतींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, सर्व मंडल आणि बूथ स्तरापर्यंत अभिनंदनाचे ठराव घेण्याची तयारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे,
देशात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीचे नवे पर्व जातनिहाय जनगणनेमुळे सुरू होईल. जातनिहाय जनगणना लोकशाही मजबूत करणारा महत्तम टप्पा असून, पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या ध्येयपूर्तीची पाऊलवाट अधिक पक्की होईल, ही खात्री आहे.
भारतावर इंग्रजांचे राज्य असताना जातनिहाय जनगणना इंग्रज सरकारने केली होती, त्यानंतर अनेक वेळा नुसत्यास जातीनिहाय जनगणनेच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेस शासनाने एकदाही हा विषय पटलावर घेतला नव्हता, काही राज्यांमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले परंतु जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्याचे धाडस फक्त भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्रजी मोदी सरकारने केले आहे असेही धैर्यशीलदादा कदम त्यांनी सांगितले
जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार? हा सामान्य माणसाच्या मनातील सवाल आहे. असे त्यांनी स्पष्ट केले
भाजपा जिल्हाध्यक्ष पुढे म्हणाले की ,काँग्रेस ने आजवर जातनिहाय जनगणने ला विरोधच केला आहे . स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आजवर योग्य पद्धतीने जातनिहाय जनगणना कधीच झाली नाही . म्हणून असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन .. २०१० मध्ये त्यावेळचे पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांनी जातनिहाय जनगणने बाबत केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करू असे आश्वासन लोकसभेत दिले होते . त्या नंतर जात निहाय जन गणने साठी मंत्रिमंडळ गटाची स्थापनाही करण्यात आली होती . मात्र या गटातील तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी . चिदम्बरम यांनी २०११ मध्ये होणाऱ्या जनगणनेत जात निहाय जनगणना करण्यास विरोध केला होता. जात निहाय जनगणना स्वतंत्रपणे केली जाईल , असे चिदंबरम यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र मनमोहन सिंग यांच्या काँग्रेस सरकारने जात निहाय जनगणना प्रत्यक्षात कधीच केली नाही . या ऐवजी काँग्रेस सरकारने सामाजिक-आर्थिक आणि जात गणना (SECC) केली . त्यासाठी ४८९३ . ६० कोटी इतका खर्च केला . मात्र कोणत्या जातीचे लोकसंख्येतील प्रमाण किती आहे याची आकडेवारी जाहीरच केली नाही . या पाहणीच्या अहवालात विविध प्रकारच्या ८ . १९ कोटी एवढ्या प्रचंड चुका होत्या . याचा अर्थ काँग्रेस सरकारने अनिच्छेने हि पाहणी अक्षरश: उरकली होती . मात्र काँग्रेस आणि काँग्रेस च्या इंडी आघाडीतील मित्र पक्षांनी या मुद्द्याचा वापर फक्त राजकीय स्वार्थासाठी केला . संविधानात जन गणना हा विषय केंद्रीय सूचित समाविष्ट करण्यात आला आहे . याचा अर्थ जन गणना या विषयाची जबाबदारी केंद्र सरकारचीच आहे. काही राज्य सरकारांनी जातींची पाहणी ( सर्व्हे ) केली आहे . ही पाहणी काही सरकारांनी योग्य पद्धतीने केली आहे , तर काही राज्य सरकारांनी राजकीय हेतूने अपारदर्शक पद्धतीने ही पाहणी केली . असे सर्व्हे समाजाची दिशाभूल करीत आहेत , जनतेत गैरसमज निर्माण करीत आहेत . मोदी सरकारने शास्त्रीय पद्धतीने ही जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे . यातून समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याची मोदी सरकारची भूमिका आहे . भारतीय जनता पार्टीने आजवर जात निहाय जन गणने ला कधीच विरोध केला नाही . केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी जात निहाय जन गणने ला भाजपाचा पाठिंबा आहे हे अनेकदा स्पष्ट केले आहे . *जनगणने बरोबरच जात निहाय गणना व्हावी अशी भाजपाची भूमिका आहे . २०२१ मध्ये सार्वत्रिक जन गणना कोरोना मुळे होऊ शकली नव्हती . आता जन गणना होईल त्याच्या बरोबरच जात निहाय गणना होणार आहे* . बिहार मध्ये जात निहाय पाहणी करण्यास भाजपाने पाठिंबा दिला होता . राष्ट्रीय जनता दल , काँग्रेस ने आपली सत्ता असलेल्या राज्यात कधीच अशी पाहणी केली नाही . १९५१ ते २०११ या काळात जेवढ्या जन गणना झाल्या त्यात अनुसूचित जाती जमातींची आकडेवारी दिली गेली . मात्र ओबीसी समाजाची आकडेवारी कधीच दिली गेली नाही
भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम असेही म्हणाले की जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष नेते हा आपलाच अजेंडा आहे आणि सरकारवर आमचा दबाव असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे अशी दर्पोक्ती करत आहेत
धैर्यशील कदमांनी निक्षून सांगितले की भारतीय जनता पार्टीचे नरेंद्रजी मोदी सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, सर्वसामान्यांचा या सरकारला पाठिंबा असल्यामुळे हे सरकार असल्या दर्पोक्तीला भीक घालत नाही, सर्वसामान्य लोकांच्या मागणीमुळेच भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्रजी मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे
भारतामध्ये अनेक जातीचे लोक गुण्या गोविंदाने रहात असताना, अनेक जातींच्या लोकांची संख्या प्रत्यक्षपणे माहीती मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत होता, त्यांना आरक्षणाचा किंवा इतर कोणताही लाभ मिळण्यासाठी अडचणी येत होत्या, जातीनिहाय जनगणना केल्यामुळे प्रत्येक जातीच्या नागरिकांची संख्या अधिकृतपणे समजणार आहे त्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय दूर होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले
पत्रकार परिषदेमध्ये धैर्यशील कदम यांनी सांगितले की मंत्रिमंडळाच्या कार्यप्रणालीच्या शंभर दिवसाच्या कामाच्या अवलोकनामध्ये ना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुसरा क्रमांक आलेला आहे त्याचबरोबर ना श्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या कडे असलेल्या पंचायत राज व ग्राम विकास मंत्रालयाचा चौथा क्रमांक आल्याबद्दल या दोघांचेही भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले त्याचप्रमाणे उसाच्या एफ आर पी मध्ये प्रतिटन 150 रुपये वाढ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ही अभिनंदन करण्यात आले
पत्रकार परिषदेच्या अगोदर सकाळी पोवई नाका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने , जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केल्या बद्दल जल्लोष करण्यात आला, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले आणि सर्वसामान्य नागरिकांना , कार्यकर्त्यांना लाडू भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवर्णाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, भाजपा सातारा शहर माजी शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा पूर्व मंडल अध्यक्ष निलेश नलावडे, सातारा शहर बाह्य मंडळ अध्यक्ष वैशालीताई टंगसाळे, सातारा शहर मध्य मंडल अध्यक्ष अविनाश खर्शीकर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
