गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी कचरामुक्त वर्धनगड ’वर्धनी माता मंदीर परिसर उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम नवीन शिक्षक भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवावी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षण सभापतींना निवेदन बिरवाडी गावचे सुपुत्र प्रा. श्रीकांत घाडगे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पुण्यात भव्य गौरव! पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मध्ये शासकिय कॉम्प्युटर व तांत्रिक कोर्सेस ना 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देणे सुरू  SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद
Home » राज्य » शिक्षण » मतदानासाठी ‘हिंदवी’च्या विद्यार्थ्यांनी लिहिली पत्रे माझ्या भविष्यासाठी मतदान करण्याचे आवाहन

मतदानासाठी ‘हिंदवी’च्या विद्यार्थ्यांनी लिहिली पत्रे माझ्या भविष्यासाठी मतदान करण्याचे आवाहन

मतदानासाठी ‘हिंदवी’च्या विद्यार्थ्यांनी लिहिली पत्रे

माझ्या भविष्यासाठी मतदान करण्याचे आवाहन

सातारा, ता. १० : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हिंदवी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र लिहले आहे. ‘माझ्या भविष्यासाठी मतदान करा,’ असा संदेश देत शाळांमधून उपक्रम राबविण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम राबविण्यात आले. पालक आपल्या मुलांचा हट्ट पुरवितात, किंबहुना मुलांच्या इच्छेला प्रतिसाद देतील आणि पालक मतदान केंद्रांवर जातील, त्यातून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, या अपेक्षेने सदर उपक्रम हिंदवी पब्लिक स्कूलने राबविला. या उपक्रमासाठी चांगला प्रतिसाद मिळाला.

या मोहिमेत विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पेतून पालकांना मतदानासाठी साद घातली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना अशाप्रकारचे पत्र लिहिले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने पालकांना पत्रे दिली आहेत. याचा सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता असल्याचा विश्वास श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली सुमारे ५० ते ६० पत्रे अतिशय आशयपूर्ण आणि औचित्याला अनुरूप, अशी लिहिली असल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीतून अनेक उपाययोजनादेखील यातून समोर आली आहे. सदर मोहीम सुरू करताना प्रारंभी शाळेतून विद्यार्थ्यांनी लिहिलेले पत्र हे टपालाच्या माध्यमातून पालकांना धाडण्याची योजना आखण्यात आली आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांनी पालकांकडे पत्रे सुपूर्द केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी

गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी चाकरमान्यांची लूट थांबवण्यासाठी आंबेनळी घाटातून मुंबई,

Live Cricket