नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » माता-भगिनींच्या आशीर्वादामुळे जयाभाऊ मोठ्या मताधिक्याने विजयी होतील- सौ.सोनियाताई गोरे

माता-भगिनींच्या आशीर्वादामुळे जयाभाऊ मोठ्या मताधिक्याने विजयी होतील- सौ.सोनियाताई गोरे 

माता-भगिनींच्या आशीर्वादामुळे जयाभाऊ मोठ्या मताधिक्याने विजयी होतील– सौ.सोनियाताई गोरे 

सातारा :भाजपा व महायुतीचे सरकार महिलावर्गांचा सर्वांगीण विकास साधणारे व त्यांना स्वाभिमान मिळवून देत त्यांचे हित पाहणारे सरकार आहे.माणखटावमध्येही आपल्या माता भगिनींच्या रक्षणासाठी व त्यांच्या सन्मानासाठी आ.जयकुमार गोरे कायम महिला वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे असतात.नुकताच त्यांनी म्हसवड, दहिवडी,वडूज येथे महिला मेळावे घेऊन त्यांचा सन्मान सोहळा केला आहे.या मेळाव्यांना महिलावर्गांनी उत्सफूर्तपणे प्रतिसाद दिला होता. त्यांचे प्रेम,साथ अन आशीर्वादच आ.गोरेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असे प्रतिपादन सौ.सोनियाताई गौरे यांनी केले आहे.

 माणखटाव मतदारसंघातील गावोगावी आ.जयकुमार गोरेंच्या प्रचारार्थ महिलावर्गाच्या बैठकीत त्या बोलत होत्या.यावेळी त्यांच्यासमवेत माणखटावच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 सौ.सोनियाताई गोरे म्हणाल्या,महायुतीच्या सरकारने माता-भगिनींसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत,उज्वला गँस,लाडकी बहिण सारख्या आदी विविध योजना सुरु केल्या आहेत.लाडकी बहीण योजना सुरु करुन त्यांच्या बॅंक खात्यात दरमहा दीड हजार रूपये जमा केले आहेत.त्यामुळे महायुती सरकारच्या पाठीमागे सर्व माताभगिनींचे आशिर्वाद असल्याने राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार आहे.

 सौ.सौनियाताई गोरे म्हणाल्या,माणखटाव मतदारसंघात जलनायक आ.जयकुमार गोरे यांनी जलक्रांती घडवून आणली आहे.येणाऱ्या काळात त्यांनी औद्योगीक व शैक्षणिक क्रांतीचा अजेंडा हाती घेतला आहे.आजपर्यंत आपण सर्वांनी खंबीर साथ दिलीय तशीच साथ या निवडणूकीतही देऊन त्यांनी हाती घेतेलली कामे पू्र्णत्वास नेण्यासाठी मदत करावी.जनतेला कुटुंब मानणाऱ्या जयाभाऊला पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी मतदारसंघात गावभेट दौरे करत आहेत.या दौऱ्यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 देवेंद्र फडणवीस साहेबांचे ताकद वाढवण्यासाठी व महायुतीचे सरकार आणण्यासाठी आ.जयकुमार गोरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी मिळवून द्यावी असे आवाहनही त्या जनतेला करत आहेत.

सुसंस्कृत व साध्या राहणीमानामुळे सौ.सोनियाताईंनी महिलावर्गांच्या मनात केलेय घर..

 माणखटावच्या जनतेला आपल कुटुंब मानत आ.जयकुमार गोरे अहोरात्र त्यांच्यासाठी झटत आहेत.त्यांना बरोबरीने साथ देत सौ.सोनियाताई गोरे याही माणखटावच्या या कुटुंबासाठी पू्र्ण वेळ देत आहेत.त्यांच्या साध्या राहणीमानामुळे व सुसंस्कृतपणामुळे महिलावर्गासह नागरीकांच्या मनात त्यांनी घर केले आहे.तीन टर्म आमदाराची बायको म्हणून असा कोणताच अविर्भाव त्यांच्या वागण्यातून दिसून येत नाही.याउलट त्यांच्या बोलण्यातला गोडवा, आपुलेपणा,साधेपणामुळे त्या आपल्यातल्याच सर्वसामान्य आहेत अशी भावना होवून जाते.त्यामुळेच त्यांच्याजवळ महिला, नागरीक,युवक, विद्यार्थी आदी लोक आपले मन मोकळे करत असतात.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket