नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » धार्मिक » भुईंजच्या श्री महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी होणार फलश्रुती चंडी याग

भुईंजच्या श्री महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी होणार फलश्रुती चंडी याग

भुईंजच्या श्री महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी होणार फलश्रुती चंडी याग

भुईंज :-शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी भुईंज ता. वाई येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सकाळी १०:३० वाजता फलश्रुती चंडी याग हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आदिशक्तीच्या या उपासना सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री महालक्ष्मी देवस्थान समिती आणि श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र,भुईंज यांच्यावतीने करण्यात आले आहे.

या आदिशक्ती उपासना सोहळ्याची माहिती देताना भुईंज येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्राच्या सौ.गंगाताई गाडे व सौ. विद्याताई किर्वे यांनी सांगितले की, चंडी-आदिशक्ती हे जगन्मातेचेच एक नाव आहे. विश्वाच्या उत्पत्तीला, स्थितीला, आणि प्रलयाला कारणीभूत असणारी ही आदिशक्ती म्हणूनच चंडी उपासना म्हणजेच आपल्या कुलदेवतेची, ग्रामदेवीची उपासना होय. आपल्या कुलदेवतेला ग्रामदेवीला प्रसन्न करण्यासाठी वेदशास्त्र, धर्मग्रंथ, पुराणामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. त्यामधील एक उपाय म्हणजे सप्तशती पाठ वाचन असल्यामुळे या चंडी याग सोहळ्यात सप्तशती पाठाचे वाचन केले जाणार आहे.

चंडी यज्ञ एक नव दुर्गा पूजा आहे. हि पूजा स्वास्थ्य, धन, शक्ति, समृद्धि, सफलता यासाठी केली जाते. चंडी यज्ञ सगळ्या कष्टांचे निवारण करते. मनुष्याला जीवनात सफलता मिळते. या यज्ञाला गणपती , भगवान शिव, नव ग्रह, नव दुर्गा (देवी) यांना समर्पित केल्याने मनुष्य जीवन धन्य होते, अशी भावना सौ.गंगाताई गाडे व सौ. विद्याताई किर्वे यांनी व्यक्त केली.

चंडी यज्ञ हवन एक असाधारण अतुलनीय आणि मोठा यज्ञ आहे जो देवीच्या शक्तींशी जोडतो. नवचंडी यज्ञ इतका शक्तिशाली आहे, की हा यज्ञ ग्रहांच्या स्थितीला आणि भाग्याला तुमच्या अनुकूल करण्यात मदत करतो. चंडी यज्ञ पूर्ण केल्यानंतर स्व:ताला दिव्य वातावरणात बघण्यासाठी आणि दिव्य देवी प्रसन्न होऊन मनाला शांतता प्राप्त होण्यासाठी सर्वांनी चंडी याग सोहळ्यात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री महालक्ष्मी देवस्थान समिती आणि श्री स्वामी समर्थ केंद्र,भुईंज यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket