शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » कर्मवीरांचे आयुष्य व विचार पुढील पिढ्यांना प्रेरणादायी

कर्मवीरांचे आयुष्य व विचार पुढील पिढ्यांना प्रेरणादायी 

कर्मवीरांचे आयुष्य व विचार पुढील पिढ्यांना प्रेरणादायी 

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातपात भेद विरहित शिक्षण व्यवस्था निर्माण करून गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यांचे आयुष्य व विचार पुढील अनेक पिढ्याना प्रेरणादायी ठरतील असे विचार जेष्ठ सामाजिक विचारवंत शिवाजी राऊत यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. कर्मवीर अण्णांचे विचार त्यांचे शैक्षणिक तत्वज्ञान, श्रमप्रतिष्ठा, ज्ञानरचनावाद, सामाजिक निष्ठा, सत्यशोधक विचारांचा आदर्श, शैक्षणिक क्षेत्रातील त्यागी व निस्पृह आयुष्य या विविध अंगाचा आढावा त्यांनी घेतला.

           यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. मनोहर निकम यांनी केले. अण्णांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी माहिती देऊन कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा परिचय त्यांनी करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर विभागाचे सहसचिव डॉ. राजेंद्र मोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. शरद ठोकळे यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. धनाजी मासाळ यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. विकास येलमार, डॉ. डी. डी. कोरडे, प्रा. कबीर वाघमारे, प्रा. एम.डी. चिंदे,प्रा. आर.जे. लोखंडे, प्रा. निलेश जमदाडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनमोल सहकार्य केले.प्रा.डॉ.सीमा कदम व विद्यार्थिनी प्रीती वाघमारे, श्रावणी झांजुर्णे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket