अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » बघून घेईन ही काय भाषा. मुख्यमंत्री आहेस ना तू! राज ठाकरे आक्रमक

बघून घेईन ही काय भाषा. मुख्यमंत्री आहेस ना तू! राज ठाकरे आक्रमक 

बघून घेईन ही काय भाषा. मुख्यमंत्री आहेस ना तू! राज ठाकरे आक्रमक 

मुंबई -मिसिंग लिंकवरून कुणी राजकारण करत असेल तर आम्ही बघून घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले. सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना? ही काय भाषा? मराठीत बोलले. त्यानंतर लगेच हिंदीत सुरू झाले. 

समोरचे आमदार मराठी, विधानसभा महाराष्ट्राची आणि आमचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. हे कशासाठी आणि कोणासाठी होतं? कदाचित फडणवीस यांना आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल तुम्हाला बघून घेईन, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

एक खासदार सांगतो, मी बॉम्ब टाकीन, माझ्या नावावर पाच मर्डर आहेत. हे सगळं आपल्या राज्यात होते. त्याला कुणाचा हात लागत नाही. कारण तो सत्तेत गेला आहे. हे बोलायची हिंमत कशी होते? कारण कुणाचा अंकुशच नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी गद्दार खासदार संजय दिना पाटील यांचा समाचार घेतला.

राम मंदिराच्या चोरीबाबत बोललो तर धर्माचा अपमान कसा?

मी राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध? हे म्हणतात की वक्फ बोर्डामध्ये जेव्हा चोऱ्या झाल्या तेव्हा तुम्ही का नाही बोललात? पण आम्हाला त्याच्याशी काय घेणं-देणं? आमचा प्रश्न राम मंदिरातील चोऱ्यांबद्दल आहे. तिथे 15 ट्रस्टी आहेत. त्यापैकी 12 ट्रस्टी हे आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित आहेत. बाकी तिथे कोणीच नाही. जर आज दुसऱ्या कोणाचं सरकार असतं आणि अशी चोरी झाली असती तर याच लोकांनी मोर्चे काढून रान पेटवले असते, अस राज ठाकरे म्हणाले.

हा महाराष्ट्राचा अपमान कसा?

मिसिंग लिंकच्या ठिकाणी खांब कोसळला, पाणी गळत आहे आणि यावर लोक बोलले की फडणवीस म्हणतात ‘माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही. मिसिंग लिंकच्या कामाबाबत बोललो, लोकांनी प्रश्न विचारले तर तो महाराष्ट्राचा अपमान कसा?’ असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket