अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » जैन धर्माचा विचार, हा शाश्वत विचार..!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जैन धर्माचा विचार, हा शाश्वत विचार..!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जैन धर्माचा विचार, हा शाश्वत विचार..!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदणी, कोल्हापूर येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवास उपस्थिती होते. यावेळी पंचकल्याणक प्रतिष्ठा आयोजन समितीच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना ‘प्रजागर्क’ उपाधीने गौरविण्यात आले, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकल जैन समाजाच्या वतीने स्वागत आणि भव्य सत्कार करण्यात आला.

जैन धर्माचा विचार आणि तत्वे ही जगा आणि जगू द्या सांगणारी आहेत, जगाच्या पाठीवर अनेक विचार आले आणि संपले. पण जैन धर्माचा विचार हा टिकला, कारण तो लोककल्याणाचे तत्त्व सांगणारा आहे, म्हणून तो शाश्वत आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. जैन धर्माच्या तीर्थंकर आणि आचार्यांनी संपूर्ण जगाला अहिंसा आणि अपरिग्रह ही तत्त्वे दिली. यामुळे आज सर्वच क्षेत्रात जैन समाजाने प्रगती केली आहे, तसेच सर्वाधिक धर्मकार्य, दानकार्य आणि समाजकार्य करणारा हा जैन समाज असल्याचे, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

आपल्या संबोधनात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. नांदणी मठाला 2000 वर्षांची परंपरा आहे. या तीर्थक्षेत्राला लवकरच ‘अ’ वर्गाचा दर्जा देण्यात येईल, तसेच जैन समाजातील तरुणांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या महामंडळाचे देखील सर्वांगाने बळकटीकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. अलमट्टी धरणामुळे येणाऱ्या पुराचा प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊ, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश अबिटकर, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. सुरेश खाडे, आ. राहूल आवाडे, आ. अमल महाडिक, आ. शिवाजीराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket