Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माझ्यासाठी ही निवडणूक माय बाप जनतेनेच हाती घेतली आहे-आ.जयकुमार गोरे

माझ्यासाठी ही निवडणूक माय बाप जनतेनेच हाती घेतली आहे-आ.जयकुमार गोरे 

माझ्यासाठी ही निवडणूक माय बाप जनतेनेच हाती घेतली आहे-आ.जयकुमार गोरे 

सातारा : (प्रतिनिधी )माझ्यावर बिनबुडाच्या टीका करणाऱ्या विरोधकांनी जरा बेताने बोलावे. प्रत्येक ठिकाणी व्यवहार पहाणाऱ्या घार्गेंनी डॉ.येळगावकरांकडून इथेनॉल प्रकल्प मातीमोल किमतीला घेतला. अवाढव्य रकमेचा विमा उतरवून त्यात स्फोट घडवला. त्यात एक जीवही गेला. ऊसाच्या काटेमारीत तर राजरोसपणे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु आहे. इथेनॉल प्रकल्पावर आणि काही कार्यकर्त्यांच्या घरी रात्रीस कोणते खेळ चालतात हे आम्हाला सांगायला भाग पाडू नका असा इशारा आ.जयकुमार गोरेंनी विरोधकांना दिला. 

     माण तालुक्यातील गावभेटीदरम्यान जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. 

    आ.गोरे पुढे म्हणाले, मतदारसंघाचे आणि जनतेचे देणेघेणे नसलेले आणि फक्त कुटुंबाच्या विकासाचा ध्यास घेतलेले प्रभाकर घार्गे माझ्या विरोधात उभे राहून निवडणूक का लढवत आहेत, त्यांचा अजेंडा कोणता आहे हे त्यांना आणि ठरलयवाल्या टोळक्यालाही माहित नाही. एक तर त्यांनी कोणत्याच गावात एकही विकासकाम केले नाही. त्यांची तशी कुवतही नाही. त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेते माण – खटावच्या पाणीयोजनांविषयी काहीच करु शकले नाहीत आणि यापुढेही करणार नाहीत. जनताही त्यांना स्विकारायला तयार नाही. आज माझ्या विरोधकामध्ये मतभेत असल्याने त्यांची घार्गेंशी भांडणे सुरु आहेत. वेगवेगळ्या डीएनएचे लोक मारून मुटकून एकत्र आल्यावर जे होते तेच आत्ता माण – खटावच्या महाविकास आघाडीत सुरु आहे. ही निवडणूक माण – खटावचा स्वाभिमान, अस्मिता, दुष्काळमुक्ती, औद्योगिकरण विरूध्द आमचं ठरलयवाले लाचार आणि तळवेचाटू अशी आहे. माझ्यासाठी ही निवडणूक माय बाप जनतेनेच हाती घेतली आहे. गावोगावी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लाडक्या बहीणींना आमचे सरकार महिना १५०० वरुन आता २१०० रुपये देणार आहे. महिन्याला २५ हजार तर पाच वर्षात सव्वा लाख रुपये लाडक्या बहीणींना मिळणार आहेत. महिलांना एसटीचे अर्धे तिकीट आहे. सुकन्या तसेच लखपती कन्या योजना सुरु आहेत. रेशनिंगचे धान्य मोफत मिळत आहे. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्याचा सन्मान निधी मिळत आहे. मोफत वीज पुरविण्यात येत आहे. आता तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. आमच्या सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक योजना राबविल्या आहेत, त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत माण – खटावची जनता विकासपर्वाला आणि दुष्काळमुक्तीच्या अंतिम लढ्याला साथ देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक अंतिम टप्प्यात आली तरी माण – खटावमधील महाविकास आघाडीचे आमचं ठरलयवाले प्रभाकर घार्गेंना उमेदवार मानायला तयार नाहीत. आत्ताही ते एकमेकांशी हमरीतुमरीवर येवून भांडत आहेत. ते निवडणूक कशासाठी लढत आहेत हेच त्यांना माहित नाही. आमच्याकडे मात्र जनताच निवडणूक हातात घेऊन मैदानात उतरली आहे. लाडक्या बहीणीच लाडक्या भावांच्या महायुतीचे सरकार आणायला सरसावल्या असल्याचेही आ.जयकुमार गोरे यांनी सांगितले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket