लोकशाही रणांगणातील लढवय्ये अण्णाभाऊ साठे यांना ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
सातारा नगरपरिषदेच्या वतीने लोकशाही रणांगणातील लढवय्ये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास तसेच भारतरत्न. डॉ बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी सातारा नगरपरिषदेचे माननीय नगराध्यक्ष श्री. अमोल मोहिते, माननीय उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी.बनकर,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)जिल्हाध्यक्ष श्री अशोक बापू गायकवाड नगरपालिका आर्थिक दुर्बल घटक सभापती श्री संकेत साठे,नगरसेविका सावित्री बडेकर,अर्चना कांबळे,तसेच सचिन कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला आदरांजली वाहिली.
यावेळी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक समतेसाठीचा संघर्ष आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमास नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





