अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा वीज वितरण व तहसील कार्यालयावर धडक; अन्यथा रास्तारोकोचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा वीज वितरण व तहसील कार्यालयावर धडक; अन्यथा रास्तारोकोचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा वीज वितरण व तहसील कार्यालयावर धडक; अन्यथा रास्तारोकोचा इशारा

कराड ( ज्ञानेश्वर शेवाळे)स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करत विविध सामाजिक, शेतकरी आणि राजकीय संघटनांनी सोमवारी कराडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढत वीज वितरण कार्यालय आणि तहसील कार्यालयावर धडक दिली. स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने थांबवावी, आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पारंपरिक मीटर पुन्हा बसवावेत, तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्याची पद्धत बंद करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

शहरातील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला. वीज वितरण कार्यालयासमोर मोठ्या संख्येने शेतकरी व विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार व रवी बडेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ, राष्ट्रवादी युवा कराड तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, जान फाउंडेशनचे जावेद नायकवडी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी वीज वितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मोर्चे करी पायी चालत प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी बोलताना पं.स. सदस्य संग्राम पवार यांनी, सातारा जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. शेतीपंपांची वीज तातडीने सुरू करावी, तसेच ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

भीमशक्तीचे आनंदराव लादे यांनी, बाहेरच्या राज्यांमध्ये २०० युनिट फ्री आहे, तसे महाराष्ट्रात का होत नाही? त्याचाही ठराव महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी केली. तसेच स्मार्ट मीटर सक्तीचे धोरण सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार टाकणारे असून, ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.

राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांनी, येणाऱ्या पावसाळी आदेशनात सक्तीने स्मार्ट मीटर न बसवण्याबाबतचा ठराव घेण्यात यावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

निवेदन स्वीकारल्यानंतर कार्यालयाबाहेर प्रशासकीय पुन्हा एकदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटरविरोधातील जनतेचा वाढता रोष लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा कोल्हापूर नाका येथे शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात लवकरच रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विविध सामाजिक, शेतकरी आणि राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिला. यावेळी कादरभाई नायकवडी, सुवर्णाताई विठुळे, शामराव मोहिते, दत्तात्रय दुपटे, संजय कांबळे, भीमशक्ती वाहतूक सेनेचे फिरोज सावकार आदी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket