Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पोलीस विभागाच्यावतीने एकता दौडचे आयोजन देशाच्या हितासाठी एकता महत्वाची-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

पोलीस विभागाच्यावतीने एकता दौडचे आयोजन देशाच्या हितासाठी एकता महत्वाची-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

पोलीस विभागाच्यावतीने एकता दौडचे आयोजन देशाच्या हितासाठी एकता महत्वाची-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

सातारा  : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पोलीस विभागाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपपोलीस अधीक्षक (गृह) अतुल सबणीस यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी दौडीमध्ये उत्साहात सहभाग घेतला.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे देशाच्या एकतेसाठी वाहिले. त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सातारा पोलीस दलाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडमध्ये देशभक्तीवर विविध गाणी तसेच घोषणा, विविध फलक घेऊन एकता दौड ही पोलीस मुख्यालय-पोवई नाका – पोलीस कवायत मैदान अशी काढण्यात आली, असे सांगून देशाच्या हितासाठी देशाची एकता खूप महत्वाची असल्याचेही पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 55 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket