सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » २४ मार्च : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गौरीशंकरचे प्राध्यापक ठरले क्षयरोग (टी बी) वरील पेटंटचे मानकरी.

२४ मार्च : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गौरीशंकरचे प्राध्यापक ठरले क्षयरोग (टी बी) वरील पेटंटचे मानकरी.

२४ मार्च : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त गौरीशंकरचे प्राध्यापक ठरले क्षयरोग (टी बी) वरील पेटंटचे मानकरी.

इंडियन पेटंट ऑफिस नवी दिल्ली यांनी नवसंशोधनाची घेतली दखल.

लिंब-मल्टी ड्रग रेजिस्टन्स क्षयरोग (टी बी) या दुर्धर आजारावर परिणामकारक व प्रभावी नवसंशोधन गौरशंकरच्या प्राध्यापकांनी केले आहे. या नवसंशोधनास इंडियन पेटंट ऑफिस, नवी दिल्ली यांनी विशेष दखल घेऊन कन्सेप्ट पेटंट म्हणून मान्यता दिली आहे. या नवसंशोधनासाठी डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. नूतन गवांदे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. क्षयरोग (टी बी) या आजाराने देशात मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोना या आजारापेक्षाही भयंकर असणारा हा आजार. यावर मात करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध तज्ञांकडून नव संशोधन केले जात आहे. गौरीशंकरच्या प्राध्यापकांनी केलेले नव संशोधन हे क्षयरोग (टी बी) साठी प्रभावी व परिणामकारक ठरणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. यामुळे क्षयरोग (टी बी) आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना एक दिलासा मिळाला आहे. मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या क्षयरोग (टी बी) या आजाराविषयी समाजात विविध मतप्रवाह आहेत. गौरीशंकरच्या प्राध्यापकांनी केलेल्या नवसंशोधनामुळे व प्राप्त पेटेटमुळे आता या आजारावर मात करता येणे शक्य होणार आहे. या नवसंशोधनासाठी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब. महाविद्यालयातील एम. फार्मसी मधील विद्यार्थिनी कोमल इचके, आसिया तांबोळी, रोहित माळवे यांनीहि या नवसंशोधनामध्ये सहभाग घेतला. पेटंटप्राप्त प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष्य मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक अनिरुद्ध जगताप, प्रशाकीय अधिकारी नितीन मुदलगीकर व जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले. 

क्षयरोग (टी बी) या दुर्धर आजारावर नवसंशोधन करणारे गौरीशंकरच्या प्राध्यापकांनी वैद्यकीय सेवा क्षेत्रात नवी क्रांती घडवली आहे त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो त्यांना या क्षेत्रात मिळालेल्या पेटंट मुळे गौरीशंकरच्या शैक्षणिक क्षितिजावर एक मानाचा तुरा रोवला आहे असे मत गौरीशंकरचे अध्यक्ष मदनराव जगताप यांनी व्यक्त केले आहे.

…श्रीरंग काटेकर जनसंपर्क अधिकारी, गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket