केळघर:अतिवृष्टीमुळे जमीन खचणे ही गंभीर समस्या आहे. अशा परिस्थितीत जमिनीचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. दरड प्रवण गावांना कोणतीही समस्या व अडचण येऊ नये यासाठी महसूल विभाग खबरदारी घेत असून ज्या गावांत भू-सख्लन होत आहे.त्या गावांतील ग्रामस्थांनी महसूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल यांनी केले.
रेंगडी वाडी येथे जमीन खचलेल्या भागाची पाहणी उपविभागीय अधिकारी श्री. बारकुल यांनी केली त्यावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रवीण मुदगुल, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील,मंडलाधिकारी संतोष भोसले,ग्रामहसुल आधिकारी संदीप ढाकणे, रेंगडी चे सरपंच बाबुराव कासुर्डे ,ग्रामपंचायत आधिकारी रवींद्र निकम,पोलीस पाटील कल्पना केळगणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. बारकुल यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.





