उन्हाळ्यात आरोग्य सांभाळा दिवसभर फ्रेश राहण्यासाठी या गोष्टी करा
सातारा -कडक उन्हाळ्यात शरीराची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.एप्रिल मे महिन्यात सगळीकडेच कडक उन्हाळा असतो. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. वाढत्या सूर्यप्रकाशामुळे शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय काहीवेळा शरीर पूर्णपणे डिहायड्रेट होऊन जाते. त्यामुळे शरीर कमकुवत होऊन जाते.
चुकीचा आहार, शरीरात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराची पचनक्रिया काहीवेळा बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात सतत काहींना काही बदल होऊन जातात. त्यामुळे नियमित दुपारच्या वेळी किंवा इतर वेळी जेवणात दही, ताक, नारळ पाणी आणि इतर थंड पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय आहारात तुम्ही काकडी, टरबूज, लाकूड सफरचंद, काकडी, पपई इत्यादी फळांचे जास्त प्रमाणात सेवन करावे.
उन्हाळ्यात सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. शरीरातील पाणी घामावाटे आणि लघवीवाटे निघून जाते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात नारळ पाणी आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे. आहारात जास्त पाणी आणि पाणीदार फळांचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही कलिंगड, काकडी, पपई, टरबूज, किंवा इतर थंड फळांचे सेवन करू शकता.
