इंदोली व पाल उपसा सिंचन योजनेस खास बाब म्हणून मंजुरी
चोरे,पाल विभागाचा दूष्काळ संपणार -आमदार मनोजदादा घोरपडे
सातारा प्रतिनिधी -बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे विधानसभेला जो शब्द मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पालीच्या सभेमध्ये आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासाठी दिला होता तो आज पूर्ण केला. गेली बरेच वर्ष रखडलेली व केवळ कागदावर असलेली इंदोली व पाल उपसा सिंचन योजना 50 मीटर वरून 100 मीटर हेड करण्यासाठी राज्य शासनाकडून खासबाब म्हणून मंजुरी घेण्यात आल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
इंदोली व पाल उपसा सिंचन योजना केली अनेक वर्ष रखडलेली होती. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी आमदार पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शासन स्तरावर तसेच जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर अनेक बैठका केल्या व या योजनेतील सर्व अडथळे दूर करून योजनेस परवानगी घेतली यामुळे चोरे विभाग पाल विभाग तसेच उंब्रजच्या वरच्या वाड्या, चरेगाव विभागासाठी ही योजना वरदान ठरणार असून येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उचावून त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती साकारणार आहे. सदर योजनेस मंजुरी मिळाली असून लवकरात लवकर याचे काम चांगल्या दर्जाचे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सोय करणार असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले. सध्या या ठिकाणी कोरडवाहू शेती केली जाते या योजनेमुळे या ठिकाणी संपूर्ण ऊस क्षेत्र व बागायती क्षेत्र तयार होणार आहे.
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले,मा. ना. जयकुमार गोरे, मा. ना.श्री. छ.शिवेंद्रसिह राजे भोसले, साहेब ,पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब ,मा. ना. मकरंदआबा पाटील, मा. खा. नितीनकाका पाटील,मा. ना. महेशशिंदे साहेब, मा. आ. अतुलबाबा भोसले,मा. धैर्यशीलदादा कदम,आदि भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या नेतेमंडळींचे सहकार्य लाभले. ही योजना मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. या विभागातील शेतकऱ्यांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले आहे. विभागातील शेतकऱ्यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले आहेत.
