ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा, दि. 21: दि- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने “ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६ साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरु केली आहे.इच्छुक उद्योजकांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत.
अर्ज मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज 28 जुलैपर्यंत जिल्हा कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी यांनी केले आहे.




