सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » Uncategorized » अन्यथा, ३० एप्रिलला वारणा धरण ते कोल्हापूर लाँग मार्च डॉ. भारत पाटणकरांचा इशारा

अन्यथा, ३० एप्रिलला वारणा धरण ते कोल्हापूर लाँग मार्च डॉ. भारत पाटणकरांचा इशारा

अन्यथा, ३० एप्रिलला वारणा धरण ते कोल्हापूर लाँग मार्च डॉ. भारत पाटणकरांचा इशारा

कराड प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर शेवाळे )गुढे-पाचगणी येवती उपसा सिंचन योजनेसाठी नाशिककडून तांत्रिक मंजुरी तसेच शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याचे लेखी पत्र २९ एप्रिलपर्यंत न दिल्यास, दि. ३० एप्रिल रोजी शिराळा, कराड आणि पाटण तालुक्यातील १०५ गावातील शेतकरी सकाळी १० वाजता वारणा धरणापासून कोल्हापूर येथील कृष्णा खोरे कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. मानेवाडी, ता. शिराळा येथे आयोजित शिराळा, कराड आणि पाटण तालुक्यातील १०५ वंचित गावांच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, तानाजी पाटील, वसंत पाटील, शंकर मोहिते, शिवाजी पाटील, बाळासाहेब माने, उदय पाटील, संदीप पाटील, सचिन मोरे, सखाराम पाटील, बाबासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, या योजनेसाठी आंदोलन, मंत्रालयातील पाठपुरावा तसेच पुणे, कोल्हापूर आणि कृष्णा खोरे कार्यालयात झालेल्या बैठकीमुळे अनेक टप्पे पूर्ण झाले आहेत. मात्र, आता नाशिककडून आराखड्यास तांत्रिक मंजुरी आणि शासनाकडून निधीबाबत लेखी हमी मिळणे अत्यावश्यक आहे. निधी मंजूर झाल्याच्या बातम्या व जाहिरातींवर विश्वास ठेवता येत नाही. अधिकारी पातळीवर लेखी हमी न मिळाल्यास दि. ३० एप्रिल रोजी वारणा धरणापासून सकाळी १० वाजता लाँग मार्च काढून कोल्हापूरकडे मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी हणमंतराव पाटील, बाळासाहेब माने, पाटील, संदीप पाटील, सचिन मोरे, सुरेश पाटील, शिंदे, एकनाथ मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. कराड व पाटण तालुक्यातील शेतकरी व महिला मोठ्या सखाराम पाटील, उदय शिवाजी पाटील, सुनील या मेळाव्यास शिराळा, संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket