नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » प्रशासकीय » ज्ञान, नवोन्मेष आणि युवाशक्तीचा संगम उडान 25-26′!

ज्ञान, नवोन्मेष आणि युवाशक्तीचा संगम उडान 25-26′!

ज्ञान, नवोन्मेष आणि युवाशक्तीचा संगम… ‘उडान 25-26’!

नागपूर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या वतीने आयोजित ‘उडान 25-26 : ज्वेल ऑफ एलआयटी अँड युथ आयकॉन अवॉर्ड्स’ कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोणतीही शैक्षणिक संस्था विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांमुळे ओळखली जाते. एलआयटीमधून घडलेले विद्यार्थी हेच संस्थेचे खरे सामर्थ्य असून, ग्लोबल अल्युमिनाय मीटमुळे हा बृहद परिवार एकत्र येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असताना जागतिक दर्जाच्या मानव संसाधनांची गरज वाढत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देणे आवश्यक असून, गुणवत्तावृद्धीसाठी राज्य शासनाने दर्जेदार विद्यापीठांना स्वायत्ततेचा निर्णय घेतला आहे. याच प्रक्रियेत लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाला स्वायत्तता देण्यात आली असून, यामुळे भविष्यात अधिक सक्षम मानव संसाधन निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेतीची गरज अधोरेखित करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने किमान 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यामध्ये शैक्षणिक व संशोधन संस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

ऊर्जा संक्रमण, ग्रीन जॉब्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगारांचे स्वरूप बदलत असून, अशा काळात एलआयटीसारख्या संस्था नवोपक्रमांची केंद्रे बनतील आणि भारताच्या विकासयात्रेत मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. 

यावेळी विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, सोलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket