नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » ठळक बातम्या » साताऱ्यात प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आंदोलकाची आई आंदोलन स्थळी…

साताऱ्यात प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आंदोलकाची आई आंदोलन स्थळी… 

साताऱ्यात प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आंदोलकाची आई आंदोलन स्थळी.

सातारा दि: कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर लोकशाही मार्गाने आंदोलन करून हा प्रश्न सोडवण्यात मदत होते. परंतु, सातारा जिल्ह्यात आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्न प्रलंबितच राहत आहेत. आंदोलनामुळे काही आंदोलकाची परिस्थिती बिघडत आहे. याबाबत काळजी करणाऱ्या एका आई ने चक्क आंदोलन स्थळी जाऊन सर्व आंदोलक कार्यकर्त्यांची विचारपूस केली. या भावनिक भेटीने अनेक जण गहिवरून गेले आहेत. 

  याबाबत माहिती अशी की, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी वाढे तालुका जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ६३ नंबर ३ येथील गॅस स्टेशन परवानगी बाबत प्रशासनाने माहिती द्यावी व उपाययोजना करावी. यासाठी पाच दिवसापासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे अनेकांचे लक्ष आहे, ज्यांनी कर्तव्यदक्षतेने लक्ष द्यावे असे जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस यंत्रणा व पुरवठा विभाग यापैकी कोणीही त्याबाबत मोठा दबाव असल्यामुळे लक्ष देत नाही. अशी परिस्थिती अनेक आंदोलनाची होत असते. 

काल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन स्थळी गर्दी झाली होती.सोमवारी दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन स्थळी श्रीमती रोहिणी अनिल उबाळे यांनी भेट दिली. आंदोलनासाठी बसलेले त्यांचे चिरंजीव श्री रमेश अनिल उबाळे व इतर आंदोलकांच्या तब्येतीची ही विचारपूस केली. जिल्हा प्रशासन जोपर्यंत न्याय देत नाही. तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू असल्यामुळे आंदोलकांचे पालक सुद्धा यामध्ये सामील झाले.

सदरची घटना सातारा जिल्ह्यात प्रथमच घडल्यामुळे जिल्हा प्रशासनाने माणुसकी म्हणून या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी होऊ लागलेली आहे. यावेळी आंदोलन करते रमेश अनिल उबाळे, महेश रणदिवे, पांडुरंग बल्लाळ, बाबुराव चव्हाण, रियाज मुलानी व सुनिता आवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket