गौरीशंकर एम.बी.ए. लिंब महाविद्यालयाचा 100% निकाल विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा जोपासली. गुणवंतांचा उचित सत्कार.
लिंब- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी शैक्षणिक वर्ष सन 2025-2026 मध्ये घेण्यात आलेल्या एमबीए प्रथम वर्षाचा गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स लिंब महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळत महाविद्यालयाची गुणवत्तेची परंपरा जोपासली आहे. यामध्ये वृषाली दत्तात्रय साळुंखे हिने 78.26% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय , तृतीय व् चतुर्थ क्रमांक अनुक्रमे रोहन कुमार शेलार 75.46% , विजया कुमार शेलार 75.39% व् वृषाली सातपुते 73.96% यांनी मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर व प्राचार्या डॉ दीप्ती बर्गे यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीप्ती बर्गे म्हणाल्या की गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस लिंब महाविद्यालयाने विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला प्राधान्य क्रम दिला आहे. गुणवत्तेबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकास यावरती विशेष भर या महाविद्यालयाने दिला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक डॉ अनिरुद्ध जगताप जयवंतराव साळुंखे आप्पा राजगे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर,प्राचार्य विजय राजे,महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कानिफनाथ जाधव यांनी अभिनंदन केले आहे.




