उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जनता दरबाराद्वारे सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणार : आ. मनोजदादा घोरपडे; साप येथे जनता दरबार

जनता दरबाराद्वारे सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणार : आ. मनोजदादा घोरपडे; साप येथे जनता दरबार 

जनता दरबाराद्वारे सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणार : आ. मनोजदादा घोरपडे; साप येथे जनता दरबार 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य लोक अतिशय आशेने माझ्याकडे येतात. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल असलेला विश्वास बघून काम करण्यास अजून ऊर्जा मिळते. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त घट्ट आणि अतूट असं माझ्या जनते सोबतच हे नातं वृध्दींगत होत चालले आहे, याचे निश्चितच समाधान वाटत आहे. जनता दरबाराद्वारे सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील, अशी ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील जनतेसाठी साप गावातील विठुराया लॉन्स येथे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान लोकांच्या भेटीगाठी घेऊन समस्या आणि अडचणी आमदार घोरपडे यांनी जाणून घेतल्या. जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रांताधिकारी अभिजीत नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांच्यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख उपस्थित होते. प्रांताधिकारी नाईक यांनी कोरेगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेत सोडविण्याबाबत थेट आदेश महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

जनता दरबारामध्ये सर्वसामान्य लोकांनी थेट आमदार मनोज घोरपडे यांच्याकडे विविध मागण्या करत निवेदने सादर केली. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांच्या समस्या,अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार घोरपडे यांनी दिल्या. यावेळी शिधाकार्ड वाटप,श्रावण बाळ पेंशन योजनेतील लाभार्त्यांना वाटप करण्यात आले. या दरबारात एकूण 150 तक्रारी आल्या त्यातील 90 तक्रारी जागेवर सोडवण्यात आल्या. उर्वरित तक्रारी पुढील कार्यवाही साठी पाठवण्यात आल्या.यावेळी वासुदेव माने काका, तुषार जाधव, तात्यासो साबळे, सागर गायकवाड, नागेश अडसूळ, भगवान कदम, रणजीत माने, सोमनाथ निकम, राजेंद्र मोरे,ऋषिकेश तुपे, ज्ञानेश्वर कदम आदी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल 

उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  नाशिक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या

Live Cricket