अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा शहरातील तुंबलेले ओढे रोगराईला निमंत्रण

सातारा शहरातील तुंबलेले ओढे रोगराईला निमंत्रण

सातारा शहरातील तुंबलेले ओढे रोगराईला निमंत्रण

सातारा -ओढ्यात दूषित पाणी  जीव जंतूचा मोठ्या प्रमाणात फैलाव सातारा शहरातील तुंबलेले ओढे रोगराईला निमंत्रण देत असून ओढ्यातील दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे सातारा शहरातील वाढती नागरी वस्ती मुळे ठिकठिकाणीच्या ओढ्यात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे व वेली उगवली असून त्यात नागरिकांनी टाकलेला कचऱ्याची भर पडत असून त्यामुळे ओढ्यातील पाणी दूषित झाले असून ओढ्याला प्रदुषणाचा विळखा पडला आहे.

शहरातील अनेक ओढ्यात रासायनिक द्रव मिसळल्याने ओढ्यातील पाणी दूषित झाले आहे परिणामी जीवंतूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचे दिसून येत आहे पावसाळ्यापूर्वी हे ओढे स्वच्छ होणे अत्यंत गरजेचे आहे सातारा नगरपालिकेने याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे नागरिकांच्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे.. चौकट सातारा शहराच्या सर्वांगीण प्रगती बाबत सातारचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे मोठे योगदान राहिले आहे जवळपास 1000 कोटी पेक्षा अधिक विकास कामे त्यांनी करून दाखवले आहेत. सातारकर यांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यांना विकास कामाची जाण असल्याने हा प्रश्नही ते निकाली काढतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

सातारा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे लोकसंख्येच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय नगरपालिकेने घेणे आवश्यक आहे विशेषता स्वच्छतेबाबत अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे याबाबत नगरपालिके प्रशासनाने शहराच्या विविध भागात घंटा गाड्यांची सोय केली आहे तरीही काही नागरिक जाणीवपूर्वक आपल्या घरातील कचरा हे ओढ्यात टाकत आहेत परिणामी ओढे तुंबत असून तेथे जीव जंतूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून नागरिकांच्या आरोग्यास ते घातक ठरत आहे.

श्रीरंग काटेकर सातारा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket