अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवा; ध्वज संहितेचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवा; ध्वज संहितेचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवा; ध्वज संहितेचे काटेकोर पालन करा– जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा,दि.6: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियान उत्साहात आणि लोकसहभागातून राबविण्यात यावे, तसेच १३, १४ आणि १५ ऑगस्ट या तीन दिवसांत प्रत्येक शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आणि प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या.

हर घर तिरंगा अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, प्रांताधिकारी आशिष बारकुल आणि नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तिरंगा फडकविताना ध्वज संहितेचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असून राष्ट्रध्वजाचा सन्मान अबाधित राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी, तसेच विशेषतः १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण तसेच ध्वजावतरण करताना ध्वज संहितेचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.

१४ ऑगस्ट रोजी फाळणी विभीषिका स्मृती दिन निमित्त भारताच्या फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या शिवाय ९ ते १३ ऑगस्ट या कालावधीत वंदे मातरम्’चे सामूहिक गायन शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व विविध संस्थांमध्ये आयोजित करण्याचे नियोजन करावे. स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्य रॅलीचे प्रभावी नियोजन प्रत्येक विभागाने करावे. या रॅलीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्था, विद्यार्थी, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket