हयातीचे दाखले काढून घेण्याचे आवाहन
सातारा-संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय,वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग लाभार्थी यानी नजीकच्या महा ई सेवा केंद्र / आपले सरकार केंद्र व सेतु केंद्रात तसेच स्वत: मोबाईल वर Benifiary Satyapan App या द्वारे हयातीचा दाखला काढून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार समीर यादव यांनी केले आहे.
हयातीचे दाखले Benifiary Satyapan Application व्दारे काढले नाहीत तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना/ इंदिरा गांधी राष्ट्रीय/वृध्दापकाळ / विधवा/दिव्यांग लाभार्थी यांचे माहे जुलै 2026 पासून लाभ बंद होणेची शक्यता असून त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी यांची राहील, असेही तहसीलदार श्री. यादव यांनी कळविले आहे.





