सातारा जिल्ह्यात मोबाईल लोकअदालतीचे व जनजागृती साक्षरता शिबीरांचे आयोजन
सातारा दि. 6 :- न्याय आपल्या दारी या नाविन्यपूर्ण संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्यामार्फत सातारा जिलह्यात मोबाईल लोकअदालतीचे व जनजागृती साक्षरता शिबीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
20 जुलै कुसंबी ता. जावली, 22 जुलै रोली भिलार ता. महाबळेश्वर, 24 जुलै रोजी भुईंज ता. वाई, 28 जुलै रोजी निंबोडी ता. खंडाळा, 30 जुलै रोजी विडणी ता. फलटण, 1 ऑगस्ट रोजी माळवाडी ता. माण, 4 ऑगस्ट रोजी रांजणी ता. माण, 6 ऑगस्ट रोजी गोपूज ता. खटाव, 10 ऑगस्ट रोजी कुमठे ता. कोरेगाव, 12 ऑगस्ट रोजी ढेबेवाडी ता. पाटण, व 14 ऑगस्ट रोजी उंब्रज ता. कराड या गावांमध्ये मोबाईल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
21 जुलै केळघर ता. जावली, 23 जुलै रोजी मेटगुताड ता. महाबळेश्वर, 27 जुलै रोजी किकली ता. वाई, 29 जुलै रोजी निंबोडी ता. खंडाळा, 31 जुलै रोजी कोळकी ता. फलटण, 3 ऑगस्ट रोजी तोंडले ता. माण, 5 ऑगस्ट रोजी विरळी ता. माण, 7 ऑगस्ट रोजी दरुज ता. खटाव, 11 ऑगस्ट रोजी जांब त्रिपुटी ता. कोरेगाव, 13 ऑगस्ट रोजी तळमावले व 17 ऑगस्ट रोजी पाल ता. कराड या ठिकाणी जनजागृती साक्षरता शिबीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील पक्षकार, विधीज्ञ आणि वित्तीय संस्था, मोबाईल कंपन्या यांनी मोबाईल लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वाघमारे यांनी केले आहे.





