अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » वडूजला मतदान जागृतीसाठी नवमतदारांशी वैयक्तिक संवाद

वडूजला मतदान जागृतीसाठी नवमतदारांशी वैयक्तिक संवाद

वडूजला मतदान जागृतीसाठी नवमतदारांशी वैयक्तिक संवाद

सातारा :मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध स्पर्धा, विविध व्याख्याने आणि उपक्रम विविध विभागांतर्फे राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जे यावर्षी प्रथमच मतदान करणार आहेत, अशा नवमतदार तरुणांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना लोकशाही आणि मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे, अशी माहिती संविधान, विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी दिली. 

७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणूक होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढणे किंबहुना शंभर टक्के मतदान होणे हे सुदृढ आणि बळकट लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे. तो राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा सन्मान आहे. उज्ज्वल भारताच्या भवितव्यासाठी जास्तीत जास्त मतदान आवश्यक आहे. नव्यानेच मतदान करणारे नवमतदार हा भारतीय लोकशाहीचा भावी आधारस्तंभ आहे, हे ओळखून त्यांच्याशी संवाद साधला जात आहे.

 आपण मतदानासाठी उत्सुक आहात का, लोकशाहीचे महत्त्व काय, मतदान करण्याचे महत्त्व काय अशा सर्व अंगानी नवमतदार तरुण-तरुणींशी संवाद साधून त्यांच्या मनामध्ये लोकशाही आणि मतदानाविषयीची जागरूकता निर्माण केली जात आहे. ‘प्रत्येक मत लाखमोलाचे आहे’ ही भावना त्यांच्या मनात रुजविल्यास हा भावी मतदार भारताचे उज्ज्वल भवितव्य घडवेल. या अभिनव उपक्रमासाठी उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी प्रोत्साहन दिले.

शिरसवडी येथील नवमतदार आनंदा इंगळे यांनी सांगितले की, मतदान हा आपला अधिकार आहे. चांगल्या व्यक्ती निवडून आल्या पाहिजेत. माझ्या एका मताने काय होणार असा संकुचित विचार आपण करू नये. तर उत्साहाने मतदान करावे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket