Home » राज्य » शेत शिवार » सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; हजारो झाडे अन् वन्यजीव भस्मसात

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; हजारो झाडे अन् वन्यजीव भस्मसात

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; हजारो झाडे अन् वन्यजीव भस्मसात

पर्यावरण संवर्धनाचा महाराष्ट्रातील एक वस्तुपाठ मानल्या जाणाऱ्या बीड तालुक्यातील पालवन परिसरातील ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे डोंगरावरील हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर या आगीमुळे अक्षरशः पाणी फेरलं गेलं आहे. आज सायंकाळच्या सुमारास पालवन डोंगररांगेत अचानक धुराचे लोट दिसू लागले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच या आगीने संपूर्ण सह्याद्री देवराई प्रकल्पाला वेढले. ही आग इतकी भीषण होती की, दुरूनच आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने वन विभागाला याची माहिती दिली.

माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ताफा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक ग्रामस्थ आणि वन कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, उन्हाळ्याचा काळ आणि वाळलेले गवत यामुळे आग विझवण्यात मोठे अडथळे येत आहेत.

या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे डोंगरावरील हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर या आगीमुळे अक्षरशः पाणी फेरलं गेलं आहे. आज सायंकाळच्या सुमारास पालवन डोंगररांगेत अचानक धुराचे लोट दिसू लागले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच या आगीने संपूर्ण सह्याद्री देवराई प्रकल्पाला वेढले. ही आग इतकी भीषण होती की, दुरूनच आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने वन विभागाला याची माहिती दिली.

माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ताफा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक ग्रामस्थ आणि वन कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, उन्हाळ्याचा काळ आणि वाळलेले गवत यामुळे आग विझवण्यात मोठे अडथळे येत आहेत.

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावलं होतं. विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यातही पाण्याचे टँकर लावून इथली झाडे जगवण्यात आली होती. या देवराईत अनेक दुर्मिळ भारतीय वृक्षांची जोपासना केली जात होती. या घनदाट जंगलामुळे परिसरात विविध पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला होता. परंतु, आजच्या या आगीत अनेक पक्ष्यांची घरटी, अंडी आणि जमिनीवरील लहान जीवजंतू मृत्युमुखी पडल्याची दाट शक्यता आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढतं आहे. कुणी जाणीवपूर्वक लावली, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. टँकरच्या पाण्यावर ही झाडे लहानाची मोठी केली, पण आज ती डोळ्यादेखत जळताना पाहून मन हेलावून जात आहे, अशी भावना पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर आता प्रशासनाने आगीच्या कारणांची सखोल चौकशी करावी आणि भविष्यात अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी ‘फायर लाईन’ किंवा इतर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कैसे हराया टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये चाहत्यांना ज्या हाय-व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा होती, त्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Live Cricket