दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन
प्रतिनिधी :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळाला असून त्यांचा तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या पाच महिन्यापासून केजरीवाल हे तुरूंगात होते. दिल्लीतील मद्यविक्री घोटाळ्यात त्यांनी इडीने अटक केली होती. हा जामीन मंजूर करताना काही अटी आणि शर्ती कोर्टाने घातल्या आहेत.
दिल्लीच्या कथित मद्यविक्री घोटाळ्यात अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. केजरीवाल यांना 20 जून रोजी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्या विरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवाल यांच्या जामीनाला विरोध केला होता. ईडीने दुसऱ्या दिवशी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि ट्रायल कोर्टाचा आदेश हा एकतर्फी आणि चुकीचा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने राऊज एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला 21 जूनला स्थगिती दिली होती.
