ड्रग्जच्या विळख्यात तरुणाई एक राष्ट्रीय समस्या – श्रीरंग काटेकर..
सातारा – सातारा शहरांमध्ये नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रग्ज इंजेक्शन बरोबर इतर अंमली पदार्थांचा सातारा शहर पोलीस दलाने पर्दाफाश केला असून यामध्ये सामील असलेल्या आरोपींची वये पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे सुशिक्षित वर्गातील ही मुले खरंतर शिक्षण व करिअर घडविण्याच्या वयात आजची तरुणाई ङ्रग्जच्या आहारी जात आहे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण देशात ङ्रग्ज माफीयांचे मोठे जाळे निर्माण झाल्याने ही एक राष्ट्रीय समस्या उभी राहिली आहे चोरटी विक्री करून लाखो रुपये कमावण्याच्या नादात ही तरुणाई स्वताबरोबरच इतर तरुणाईचे जीवन बरबाद करीत आहेत तरुणांना आकर्षित करणारे हे अंमली पदार्थाचे लोण आता ग्रामीण भागातील वाङीवस्तीपर्यंत पोहोचले आहे विशेषतः सातारा जिल्ह्यात ङ्रग्जचे सापडत असलेले साठे हा चिंतेचा विषय बनला आहे.
मानसिक आजाराच्या रुग्णांवर प्रभावी उपचारासाठी मेफेङ्रोन (एम.डी )औषधाची निर्मिती जर्मनी कंपनीने केली होती परंतु मेफेङ्रोन ( एम.डी) चा वापर नशेसाठी होऊ लागल्याने केंद्र सरकारने या औषधावर बंदी घातली मेंदूला उत्तेजना निर्माण करणे व ते बराच काळ टिकवणे हा मेफेङ्रोन (एम.डी) चा प्रमुख गुणधर्म आहे तरुणाईला याचे आकर्षण वाढल्याने याची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली.
ड्रग्ज माफीयाने केलेला विस्तार आता मुंबई पुणे नागपूर सारख्या मेट्रोसिटी पुरता मर्यादित न राहता त्याचे पालेमुळे आता थेट गाववस्तीपर्यंतच्या तरुणाईपर्यंत पोहोचले आहेत. तरुणाईतील उत्साह व अंमली पदार्थांचे आकर्षणपोटी नवतरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडत आहे. हे विदारक चित्र व वास्तव रूप आता समाजामध्ये दिसून येत आहे. चंगळवादीवृत्तीतून निर्माण होणारी ही संस्कृती भविष्यात राष्ट्रहिताला बाधक ठरणार हे निश्चित याबाबत सामाजिक प्रबोधन व व्यापक चळवळ उभी करणे काळाची गरज बनली आहे.
नवतरुणांच्या मनावर प्रभाव पडणाऱ्या मेफेड्रोन (एम डी) विळखा तरूणाईला मारक ठरत आहे. अंमली पदार्थाचा प्रसार व प्रचार ज्या वेगाने होत आहे ते भयानक आहे तरुणाई मध्ये या अंमली पदार्थाची क्रेझ दिवसे दिवस वाढत आहे. यामुळे भविष्यात देशासमोर एक मोठे संकट व आव्हान उभे राहणार आहे. चंगळवादी संस्कृतीच्या आहारी गेलेली तरुणाई जोशाने बेधुंद झालेल्या तरूणाई अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे. रेव्ह पार्टीच्या व तारुण्यातील जोशाने बेधुंद झालेल्या तरुणाई अंमली पदार्थांच्या व्यसनधीन झाली आहेत. परिस्थितीचे भान नसलेली तरुणाईमधून नवी संस्कृती उदयाला येत आहे. विनाशाकडे घेवून जाणाऱ्या या तरुणाईला वेळेच व्यसन घालणे गरजेचे आहे. अंमली पदार्थांची सहज उपलब्धता हा चिंतेचा विषय आहे मोठ्या मोठ्या शहराप्रमाणे छोट्या छोट्या शहरात ही आता अंमलीपदार्थाची तस्करी वाढली आहे. अप्पू गांजा चरस हीरोइन बरोबरच आता मेफेड्रोन (एम.डी) विळखा तरूणाईला पडला आहे. हा विळखा दूर करण्यासाठी तरूणाई मध्ये जनजागृती आवश्यक आहे. तरुणाईचे जीवन उध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थ व तस्कराबाबत कठोर धोरण गरजेचे आहे. अन्यथा तरुणाईचा असलेला भारत देश व्यसानाधीन भारत म्हणून ओळखला जाईल. महासत्तेच्या स्वप्नपूर्तीला सुरुंग लावणाऱ्या शक्तीच तरुणाई मध्ये व्यसनाधींचे बीज रोवत आहेत. हे तरुणाईने ओळखून अंमली पदार्थ सेवनापासून परावृत्त होणे गरजेचे आहे.
आधुनिकतेने निर्माण झालेली चंगळवादी वृत्ती ही आजच्या तरुणाईची खरी फॅशन झाली आहे बेफान व बेधुंद जीवन हा जगण्याचा एक राजमार्ग तरुणाईने स्वीकारला आहे. ही तरुणाई व्यसनाधीन ते कडे कळत नकळत वळली आहे. देशभरातील तरुणाईवर परदेशी संस्कृतीचा पगडा दिवसेंदिवस वाढत आहे. डान्सबार व पव संस्कृतीमुळे तरुणाई बेफान झाली आहे. या बेफान तरूणाईला अंमली पदार्थांच्या सेवनासाठी तस्कराकडून प्रवृत केले जात आहे. उत्साहाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या तरुणाई बेधंदपणे जगण्यासाठी अंमली पदार्थाचे सेवन घेण्यास भाग पडत आहे.गांज्या चरस अफू हिराईन आणि मेफेड्रोन (एम.डी) ने असंख्य तरूणाईस घेरले आहे. या अंमली पदार्थांची नशाही तरुणांना बेधुंद करत आहे. इतर अंमली पदार्थांच्या तुलनेने एम डी ही अल्प किमतीत प्राप्त होत असल्याने तरुणाईचा ओढाही याकडे वाढला आहे. या पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे संपूर्ण देशभर मोठे रॅकेट उभे राहिले आहे. जम्मू-काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत या पदार्थाची मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उलाढाल ही देशासमोर चिंतेची बाब आहे.
बेफाम बेधुंद झालेली तरुणाई आज नशेच्या आहारी जात आहे. चंगळवाद संस्कृतीमुळे तरुणाई बेहोश झाली आहे. तरुण वयातील ही मुले अफू गांजा चरस आणि आता मेफेड्रोन (एम डी) ची शिकार झाली आहे. नशा शिवाय यांना जीवन जगता येत नाही. अशा परिस्थिती तरूणाईची झाली आहे अंमली पदार्थाचे सेवन ही त्यांची भूक बनली आहे. कॉलेज जीवनातील तरुण तरुणाई या अंमली पदार्थाच्या सेवनाला बळी पडत आहेत. पुणे मुंबई नागपूर सारख्या मोठ्या शहरात याचे प्रमाण अधिक असले तरी याचा प्रसार व प्रचार आता ग्रामीण स्तरावरील तरूणाई पर्यंत पोहोचला आहे ही दुर्दैवी बाब आहे.
श्रीरंग काटेकर सातारा.
