दिवसा वीज पुरवठा करावा वाई तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे-)जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी वर्गाकडे नेहमी दुर्लक्ष केले जात आहे माती मध्ये (बियाने रुपी ) पैसे टाकून जुगार खेळणाऱ्या शेतकरी वर्गाची व्यथा कधीच ऐकली जात नाही ना त्याच्या पिकला योग्य हमीभाव दिला जातो ना दुधाचे दर वाढवले जात ना त्याच्या उसाला योग्य दर दिला जातो या उलट 3 रुपये दुधाचे दर कमी करून ऐक प्रकारे शेतकऱ्याचे पिरावणूक केली जात आहे आणि आता त्यात भरीत भर महावितरणने तयार केलेल्या कृषी वीज पुरवठा (Power supply) वेळापत्रकाचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. कारण हा वीज पुरवठा रात्रीचा केला जात आहे. एकीकडं सातारा जिल्ह्यात कडाक्याची थंडी सुरु आहे. तर दुसरीकडं शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा धोका आहे. अशा स्थितीत वाई तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यानं मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रात्रभर एवढ्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी पीक जगवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पिकांना रात्रभर पाणी देत आहेत. एकीकडं वाई तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे. शरीर गोठावणारी थंडी पडली आहे. तर दुसरीकडं वन्य प्राण्यांचा धोका आहे. अशा स्थितीत रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री शेतात पहारा द्यावा लागत आहे.
सोमवार ते बुधवार रात्री ९.१५ ते पहाटे ५. १५ वाजेपर्यंत वीज पुरवठा करून महावितरण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी रात्रीला वीज पुरवठा केला जात आहे. रात्री नऊ तर कधी रात्री १० वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा दिला जात आहे. शेतात असलेल्या ऊस आणि पालेभाजी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागावे लागत आहे. सध्या कडाक्याचा हिवाळा असून रात्री जिल्ह्यातील तापमानाचा पारा अधिक घसरत आहे. अशा कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना काम कराव लागत आहे. तर दूसरीकडं रात्री शेत शिवरात फिरणारे वन्य प्राणी याचा शेतकऱ्यांच्या जीवावर धोका आहे . अशा स्थितीत काही शेतकरी पीक जगवण्यासाठी एकत्र येत सामूहिक काम करत आहेत. दरम्यान, रात्री वीज रोहित्राचा फ्यूज गेला किंवा किरकोळ बिघाड आला तर तो व्यवस्थित करण्यासाठी कर्मचारी रात्रीला उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून फ्यूज टाकावी लागत आहे. हे काम नाही जमले तर त्या दिवशी पिकांना पाणी देणं मुकलेच म्हणून समजा अशी स्थिती आहे.तसेच महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांची उद्धटपणे बोलत आहेत आशा कर्मचाऱ्यांवर महावितरण अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत त्यामुळे त्यांचा माजोरे पणा आणखी वाढला आहे त्या मुळे दिवसा वीज पुरवठा करावा अशी, शेतकऱ्यांची मागणी होत आहे . जगाचा पोशिंदा जगाला जगवण्यासाठी धडपड करत आहे. अशा स्थितीत त्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे . त्यामुळं शेतकऱ्याची दिवसा वीज देण्याच्या मागणी मान्य करून बळीराजाच्या संजीवनीसाठी महावितरणने दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.