कराड अर्बन बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ जाहीर महाबळेश्वर तालुक्यात गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करा: पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांचे आवाहन. दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेचा नलगे कुटुंबाला लाभ- शाम झोरे शालेय जीवनातील जुन्या आठवणींनी भारावले मन ५० वर्षातील विद्यार्थींनी जमल्या एकत्र, लोणंद येथील पवार विद्यालयात स्नेहमेळावा कास पठार हंगाम २०२६चा उत्साहात शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन; पर्यावरणपूरक पर्यटनाचा संदेश
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (CCS) बैठक पार पडली.

या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते.

कॅबिनेट सुरक्षा समितीने घेतले ‘हे’ 5 मोठे निर्णय :

1) 1960चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल, जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलिकडच्या दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील.

2) अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल. ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मे 2025 पर्यंत यामार्गाने भारत सोडण्याचे आदेश.

3) पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजना (SVES) या योजनेखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याआधी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले कोणतेही असे व्हिसा रद्द मानले जातील. सध्या सार्क व्हिसा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आलेली आहे.

4) नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण/लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना ‘पर्सना नॉन ग्राटा’ घोषित करण्यात आलं आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मदत देण्यात आलेली आहे. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारताच्या संरक्षण/नौदल/हवाई सल्लागारांना परत बोलावण्यात आलेलं आहे. संबंधित उच्चायोगांमधील ही पदे रद्द मानली जातात. दोन्ही उच्चायोगांमधून सेवा सल्लागारांचे पाच सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील.

5) 1 मे 2025पर्यंत आणखी कपात करून उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या 55 ​​वरून 30 पर्यंत कमी केली जाईल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड अर्बन बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ जाहीर

कराड अर्बन बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ जाहीर कराड :सहकारी बँकिंग क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह

Live Cricket