तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वरमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जागरूकता स्पर्धा: स्वच्छ भारत अभियानाला चालना

महाबळेश्वरमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जागरूकता स्पर्धा: स्वच्छ भारत अभियानाला चालना

महाबळेश्वरमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जागरूकता स्पर्धा: स्वच्छ भारत अभियानाला चालना

महाबळेश्वर, दिनांक १० जानेवारी २०२५: माझी वसुंधरा अभियान ५.० आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेमार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जागरूकता निर्माण करण्याचा आणि स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून या स्पर्धांची सुरुवात झाली आहे. चित्रकला, रंगभरण, निबंध आणि नाट्य या विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला आहे.

चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता सेवकांच्या कार्याची प्रशंसा करणारी, पारंपारिक उर्जा स्त्रोतांचे महत्त्व दाखवणारी आणि पर्यावरण जतनाची संदेश देणारी चित्रं काढली. रंगभरण स्पर्धेत प्लास्टिक बंदी आणि कचरा वर्गीकरण या विषयांवर आधारित रंगभरण केले जाणार आहे. निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या विविध पैलूंवर लिहिले. तर, नाट्य स्पर्धेत महाबळेश्वर शहराचा वारसा, प्लास्टिक बंदी आणि वसुंधरेचे जतन यासारख्या विषयांवर नाटक सादर केले जाणार आहे.

या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नगरपरिषदेमार्फत पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन त्यांचे उत्साहवर्धन करण्यात येणार आहे.

श्री. पाटील यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये उत्साहात सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जागरूकता निर्माण होईल आणि ते स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभागी होतील.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई) तडीपार इसमास जेरबंद करुन

Live Cricket