काळुबाईच्या दर्शनाला उसळला भक्तांचा महापूर
मांढरदेव प्रतिनिधी-(राजगुरू कोचळे) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांन, तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत. अशातच या कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदारगडावर आई कळुबाई देवीचा दर्शनाला रविवारी तिच्या भक्तांचा महापूर उसळल्याचे पाहावयास मिळाले.बातमी सविस्तर
मांढरगडावर शारदीय नवरात्र उत्सव मागील सात दिवसांपासून सुरू आहे.घटस्थापनेपासून ते सहाव्या माळेपर्यंत हजारो भाविक देवीच्या दर्शनाला रोज येत आहेत.मागील दोन दिवसापासून मांढरदेव येथील वातावरणामध्ये प्रचंड बदल झालेला असून.गर्द दाट दुखे कडाक्याची थंडी आणि पावसाची संततधार येत असताना सुद्धा नवरात्र उत्सवातील सातव्या माळेला रविवारी भाविकांनी देवीच्या दर्शनाला प्रचंड अशी गर्दी केली.अंदाजे दोन लाखाहून जास्त भाविक देवीच्या दर्शनाला आल्याचे पहावयास मिळाले.आणि या गर्दीचे ते दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाला गडावर भक्तांचा महापूर उसळल्या सारखे वाटत होते.
सतत येणाऱ्या पावसामुळे व दाट दुखामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे आणि त्यातच गडावर झालेली भक्तांची लाखोंच्या संख्येने गर्दी यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या.मांढरदेवीला येणारे वाई व भोर दोन्ही घाट मार्गामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी झाल्याचे पहावयास मिळाले.परंतु प्रचंड गर्दी झालेले असताना सुद्धा रस्त्याने शिस्तीमध्ये प्रवास करून देवीचे दर्शन घेऊन भाविक सुखरूप परतताना पहावयास मिळत होते.देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते.आणि त्यामुळे त्यांना जो थंडीचा,पावसाचा गर्दीचा त्रास झाला होता तो ते पूर्णपणे विसरून गेल्याचे भासत होते.





