मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १९ वा वर्धापनदिन व संस्थापक नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार एपस्टीन फाईलमधील उल्लेखाचं सरकारने स्पष्टीकरण द्यावे – पृथ्वीराज चव्हाण
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला 

मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला 

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार-नामदार जयकुमार गोरे 

सातारा : मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाचा पदभार नामदार जयकुमार गोरे  यांनी घेतला.येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा सुधारण्यावर भर देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी १०० दिवसात २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प नामदार जयकुमार गोरे यांनी केला केला.

ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाल्याने मंत्रीपदाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना राबवून खात्याचे नाव उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले. १०० दिवसांचा कार्यक्रम समोर ठेवून काम करणार असून प्रथमच राज्याला २० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. १०० दिवसात या घरांना मान्यता देवून काम चालू करणार असल्याची ग्वाही जयकुमार गोरे यांनी दिली. पंतप्रधान यांची महत्वाकांक्षी योजना लखपती दीदी कार्यक्रम १०० दिवसात करण्याचा संकल्प यावेळी जयकुमार यांनी व्यक्त केला . ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी ५० लाख अतिरिक्त लखपती दिदी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल दादा कुल, आमदार सचिन कांबळे-पाटील,भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, श्री. अरुण गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

Post Views: 746 मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह कराड(अली मुजावर )प्रतिनिधी

Live Cricket