महाबळेश्वर रांजनवाडी येथील एस.टी.पी प्रकल्प निष्क्रीय मैला मिश्रित सांडपानी उघड्यावर
महाबळेश्वर (प्रतिनिधी) :-महाबळेश्वर तालुका केंद्रीय पर्यावरण संरक्षणासाठी अतिसंवेदनशिल असताना केंद्रीय पर्यावरण संरक्षनाचे नियमांची तसेच मा.मुंबई उच्च न्यायालयाने प्रदुषण रोखणे संदर्भात दिलेल्या निर्देशाची पायमल्ली होताना दिसून येत आहे या बाबतचे वृत्त असे की महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील रांजणवाडी परिसरात नगरपालीकेने उभारलेल्या मैला सांडपाणी शुद्धी करनासाठी बांधलेल्या एस.टी.पी प्रकल्प निष्क्रीय अथवा निकृष्ट झाल्याने बांधलेल्या टाक्यां मधून मैला मिश्रीत सांडपाण्यावर कोनतीही शुद्धीकरणाची प्रक्रीया न होता मैला मिश्रीत सांडपानी नैसर्गीक ओढ्या मधून व इतस्त: उघड्यावर सोडून दिले जात असल्याने वाहणाऱ्या ड्रेनेज मैला मिश्रीत पाण्यामुळे रांजनवाडी परीसरात प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे या संदर्भात रांजनवाडी येथील कार्यकर्ते साहिल मुजावर व नागरिकांनी महाबळेश्वर नगरपालीकेला व तहसील महसुल प्रशासनाला सन २०१७ पासुन लेखी तक्रार देऊनही महाबळेश्वर नगरपालीकेने व तहसील महसुल प्रशासना कडुन रांजनवाडी नागरीकांना सांडपान्याच्या प्रदुषना मूळे होनार्या समस्येकडे दुर्लक्ष केले असल्याने अखेर रांजनवाडी येथील कार्यकर्ते साहील मुजावर व नागरीकांनी शासकीय वरीष्ट स्तरावर तक्रार दाखल करून तक्रारीत विवीध मुद्दे उपस्थीत करून तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे .
मिळालेल्या माहिती नुसार महाबळेश्वर नगरपालीका हदीतील रांजणवाडी येथील नगरपालीकेने उभारलेला परंतू निष्क्रीय अवस्थेत असलेल्या एस.टी.पी मधून उघड्यावर सांडपानी वाहून होत असलेल्या प्रदूषणाबाबत महाबळेश्वर नगरपालिकेकडे दि. १९ / ०५ / २०१७ आणि दि.१९/०३/२०१८ रोजी पासुन लेखी पत्रव्यवहार केला होता तसेच दि.०३/०३/२०२२ रोजी महाबळेश्वर तहसीलदार , गावकामगार तलाठी आणि मुख्याधिकारी यांच्याकडेही तक्रार करून समक्ष भेटून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील महाबळेश्वर नगरपालीके कडून अद्याप पर्यंत महाबळेश्वर नगरपालीका व तहसीलदार महाबळेश्वर यांच्या कडुन कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.
महाबळेश्वर येथील रांजणवाडी परिसरात काही वर्षांपूर्वी महाबळेश्वर नगरपालीकेन केलेली ड्रेनेज पाईपलाईन आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सध्या निकृष्ट व कुचकामी ठरला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे साठवण टाक्यांवर अतिरिक्त ताण पडत असून काही ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने मैला मिश्रित पाणी उघड्यावर नैसर्गीक अधिवासात वाहत असल्याने प्रदुषणाची समस्या जटील गंभीर होत असल्याचे दिसुन येत आहे .
मैला मिश्रीत सांडपानी शुद्धी करनासाठी महाबळेश्वर नगरपालीकेने बांधलेल्या एस .टी . पी टाक्यांमधून ओसंडून वाहणारे मैला मिश्रीत दूषित पाणी नैसर्गिक ओढ्यातून थेट वेण्णा नदीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे या मैला मिश्रीत सांडपाण्याचे प्रदुषणामुळे ओढ्यालगतच्या शेतजमिनीतील विहिरींमध्ये देखील दूषित पाणी पाझरत असून, विहिरींचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी अयोग्य झाले आहे परिसरात पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास देखील गंभीर धोका निर्माण झाला आहे.
सांडपाण्यामुळे विहिरी दूषित झाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वापरता येत नाही ज्या मुळे मागील काहि वर्षापासुन शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे हेच पाणी महाबळेश्वरला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसपर्यंत पोहोचून भविष्यात संपूर्ण शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि वेन्ना नदीचे पात्र प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते अशी दाट शक्यताही वर्तवण्यात येत आहे .
मिळालेल्या माहितीनुसार रांजणवाडी परिसरासाठी महाबळेश्वर नगरपालीके कडुन ‘सांडपाणी प्रकल्प’ (STP) मंजूर झाला असून त्यासाठी निधीचीही व्यवस्था करण्यात आली होती मात्र नगरपालिकेकडून या मोठ्या क्षमतेच्या प्रकल्पाची अंमलबजावणी आजतागायत केलेली नाही.
महाबळेश्वर नगरपालीका हददीतील रांजनवाडी येथील नागरीकांनी सन २०१७ पासून अनेक वेळा लेखी तक्रारी आणि प्रत्यक्ष भेटी देऊनही महाबळेश्वर नगरपालिकेकडून ठोस कृती केलेली नाही ड्रेनेज टाक्यांची देखील नियमित साफसफाई केली जात नसल्याने मानवी वस्तीत घाण पसरून पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने
रांजवाडी येथील नागरिकांनी वरीष्ट शासकीय स्तरावर तक्रार दाखल करून प्रमुख मागण्या केल्या आहेत .
१) रांजणवाडी परिसरातील ड्रेनेज टाकी व पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती आणि नियमित साफसफाई करावी.
२) २ ते ३ हजार लोकसंख्येच्या क्षमतेचा STP प्रकल्प त्वरित कार्यान्वित करावा.
३) दूषित विहिरींच्या पाण्याची तपासणी करून नगरपालिकेकडून विहिरींचे शुद्धीकरण करण्यात यावे.
४) नगरपालीकेने मैला मिश्रीत पान्यासाठी बांधलेल्या टाक्यांमधून प्रदुषीत पाणी उचड्यावर वाहत असल्याने शेतकऱ्यांच्या शेत जमीनींचे व विहिरींचे झालेल्या नुकसानीची महाबळेश्वर नगरपालिकेकडून योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई मिळावी .
ईत्यादी निवेदनाव्दारे मागण्या केल्या असून महाबळेश्वर नगरपालीका हददीत रांजनवाडी परीसरातील नागरीकांनी शासन स्तरावर मा.प्रधान सचिव पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग , मा. विभागीय आयुक्त,पूणे , मा . जिल्हाधिकारी ,सातारा , मा.प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण विभाग, पुणे , मा.चेअरमन मुंबई पर्यावरण संस्था तसेच स्थानीक पर्यावरण कार्यकर्ते ईत्यादिंना व वरीष्ट पातळीवर निवेदन पाठवून महाबळेश्वर येथील रांजनवाडी परीसरात महाबळेश्वर नगरपालीकेच्या निष्क्रीय एस .टी .पी प्रकल्पा मधून होत असलेल्या प्रदुषन थांबवनेसाठी रांजनवाडी येथील कार्यकर्ते साहिल मुजावर व नागरीकांनी पत्रव्यवहार करून वरीष्ट प्रशासकीय अधिकार्याकडे मागनी केली आहे .
महाबळेश्वर नगरपालीकेने रांजनवाडी परीसरात मैला मिश्रीत पान्यासाठी बांधलेल्या एस.टी.पी च्या टाक्यांमधून उघड्यावर वहात असलेले मैला मिश्रीत सांडपाण्या मूळे नैसर्गीक अधिवासात होत असलेले प्रदुषन व नागरीकांना होत असलेली गंभीर समस्या थांबवने बाबत व शेतकर्यांना आर्थिक नुकसान भरपाई व इतर केलेल्या मागन्या नुसार कार्यवाई न केल्यास प्रसंगी महाबळेश्वर नगरपालीके समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करन्याचा ईशारा रांजनवाडी येथील नागरीकांनी दिला आहे.




