कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » गझल गायकीतील बादशहा तलत मेहमूद यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

गझल गायकीतील बादशहा तलत मेहमूद यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद 

गझल गायकीतील बादशहा तलत मेहमूद यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद 

सातारा :”फिर वही शाम वही गम वही तन्हाई है “, मखमली आवाजाचे व गझल गायकीतील बादशहा तलत मेहमूद यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम रविवार दिनांक 22 सप्टेंबर सन 2024 रोजी सायंकाळी दीपलक्ष्मी संस्कृती हॉल सातारा येथे पार पडला . या संगीत कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. याची संकल्पना कला सरगम चे संस्थापक मा. अनिल वाळिंबे असून गायक अनिल पांडे यांनी संयोजन केले होते .

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डी एन वैद्य ,अनिल वाळिंबे, रमेश वेलणकर व शिरीष चिटणीस हे होते. शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले . असा कार्यक्रम आपण पुण्यातही घेऊ शकतो व त्याची जबाबदारी मी घेईन असे त्यांनी आवर्जून सांगितले . माजी आयुक्त मा . डी एन वैद्य यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले . सातारा शहरामध्ये दोन तीन मोठे हॉल एकत्र असणाऱे सांस्कृतीक संकुल असावे व त्यासाठी प्रायोजक व जागा मिळवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न व मदत करेन असे सांगितले .

या कार्यक्रमासाठी गायक म्हणून डॉ. रवींद्र पारसनीस , जयंत सरवटे , सुनील पटवर्धन , एडवोकेट लक्ष्मीकांत आघोर , अरुण कुलकर्णी , सौ माणिक सरवटे , प्रिया अघोर , मधु गिजरे , विजया चव्हाण आणि मुकुंद पांडे यांनी बहारदार गीते गायिली .

कार्यक्रमा दरम्यान ज्येष्ठ समीक्षक अनिल वाळिंबे व रमेश वेलणकर यांनी आपले विचार व मते मांडली व गायकांचे व निवेदकाचे कौतुक केले . या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण , नर्म विनोदी शैलीतील व खुसखुशीत असे निवेदन डॉ. मुरलीधर वारुंजीकर यांनी केले . ध्वनी संयोजन व्यवस्था कुंभार यांनी योग्य पद्धतीने सांभाळली .

या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद होता . असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेतले जावेत असे अनेक श्रोत्यांनी सुचविले .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket