कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » लोक जातीयवादी नसतात, तर नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयवादी असतात-मंत्री नितीन गडकरी

लोक जातीयवादी नसतात, तर नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयवादी असतात-मंत्री नितीन गडकरी

लोक जातीयवादी नसतात, तर नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयवादी असतात-मंत्री नितीन गडकरी

आजकाल मागासलेपणा हा राजकीय स्वार्थ बनत चालला आहे. कोण जास्त मागास आहे याची सध्या स्पर्धाच सुरु आहे. पण माझा अनुभव असा आहे की, लोक जातीयवादी नसतात, तर नेते स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयवादी असतात, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

नागपूर येथे झालेल्या सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या दीक्षांत समारंभाला गडकरी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी जातीयवादाचे विष फेकून देण्याच्या दृष्टीने काही विधाने केली. सामाजिक विषमता दूर करण्याची गरज असून जातीभेद संपला पाहिजे आणि ही प्रक्रिया स्वतःपासून सुरू झाली पाहिजे असे सांगून गडकरी पुढे म्हणाले की, समाजाच्या सर्वांगिण आणि एकजिनसी विकासासाठी जितक्या लवकर जाती संपतील, तितके उत्तम. एखाद्या व्यक्तीचे मूल्य जात, धर्म, भाषा किंवा लिंग यावरून नव्हे तर त्याच्या गुणांवरून ठरवले पाहिजे.

माणूस त्याच्या जाती, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगावरून ओळखला जात नाही, तर त्याच्या गुणांवरून ओळखला जातो. म्हणून आम्ही जात, पंथ, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर कोणाशीही भेदभाव करणार नाही. मी राजकारणात आहे आणि इथेही जातीयवाद चालू आहे. पण मी माझ्या पद्धतीने काम करतो. यापूर्वी गडकरी जातीभेदाबद्दल म्हणाले होते की, मी जातीच्या आधारावर भेदभाव करत नाही. मला पुन्हा मते मिळोत की नाही. पण अनेकदा लोक जातीच्या आधारावर मला भेटायला येतात. मी त्या ५०,००० लोकांना सांगितले की, जो कोणी जातीबद्दल बोलेल, मी त्याला जोरदार लाथ मारीन. मी सार्वजनिक ठिकाणी धर्म आणि जातीबद्दल बोलत नाही. मी निवडणूक हरलो किंवा माझे मंत्रीपद गमावले तरी मी या तत्वावर ठाम राहीन.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket