कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » वाई मांढरदेवी रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा

वाई मांढरदेवी रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा

वाई मांढरदेवी रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा

मांढरदेव प्रतिनिधी -वाई मांढरदेव रस्त्याचे काम चालू असल्यामुळे ठेकेदाराकडून योग्य नियोजन न केल्याने आज काळुबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना घाटात वाहतूक कोंडीचा फटका बसला भाविक घाटामध्ये दोन ते तीन तास ताटकळत बसावे लागले त्यामुळे भाविकांमधून तीव्र नाजाजीचा सूर उमटला आहे. कापूरहोळ-भोर-मांढरदेव-वाई अशा मार्गाचे काम दोन वर्षापासून चालू आहे या कामासाठी मांढरदेवी-भोर घाट काही महिने बंद ठेवण्यात आला होता या घाटाचे काम चालू असतानाच वाई मांढरदेवी घाटाच्या कामाला ठेकेदाराने प्रारंभ केला आहे.

काम चालू असताना रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे मात्र पर्यायी मार्गाची व्यवस्था नीट न केल्याने श्री काळुबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना घाटात आज दोन ते तीन तास ताटकळत राहावे लागले घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने भाविक ताटकळत राहिले यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला. घाटात झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाविकच प्रयत्नशील होते प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 

आज रविवार सुट्टीचा वार असल्याने मांढरदेव मध्ये देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होती भाविक दुचाकी, रिक्षा, कार,बस या साधनांनी मांढरदेवला येत होते मात्र वाईहून आल्यावर तीन तास घाटात अडकून पडल्याने मांढरदेव येथे तीन तास उशिरा पोहोचत होते वास्तविक एकेरी वाहतूक चालू असताना ठेकेदारांनी काही लोक नेमून वाहतूक सुरळीत ठेवणे अपेक्षित होते मात्र तसे न झाल्याने पुणे,मुंबई,नाशिक,कोल्हापूर,सातारा, वाई या ठिकाणाहून आलेले भाविक घाटातच अडकून पडले त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सोसावा लागला. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन योग्य नियोजन करावे अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket