खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वाई तालुक्यातील जनतेशी साधला संवाद
वाई प्रतिनिधी :सातारा लोकसभा निवडणूक अनुषंगाने आज वाई शहरातील मंडई येते भाजी विक्रेते, व्यापारी, तसेच नागरिकांशी चहा कट्टा निमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी संवाद साधला.
वाई तालुक्यातील जनतेने राजघराण्यावर आजपर्यंत भरभरून प्रेम केले, आमचे वाई शहराशी जुने ऋणानुबंध आहेत. या परिसरातील लोकांनी केलेल्या स्वागताने मन भारावून गेल्याचे खासदार उदयनराजे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या विकासावर बोलताना राम मंदिर, कलम 370 असे अनेक धाडसी निर्णय मोदीजींनी घेतले. मोदीजींच्या हातात देश सुरक्षित आहे. मोदीजींच्या 3 ऱ्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था जगाच्या 3 क्रमांकाची असेल असेही महाराज म्हणाले.यावेळी मा.आमदार श्री मदनदादा भोसले, आर.पी.आय जिल्हाध्यक्ष श्री अशोक गायकवाड, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ सुरभीताई भोसले, श्री विजयसिंह नायकवडी, श्री विकास शिंदे, श्री चंद्रकांत भोसले, श्री दीपक ननावरे, श्री रोहिदास पिसाळ, सदानंद लेले, श्री विजय ढेकाने, श्री अलंकार सुतार, श्री तेजस जमदाडे, श्री राकेश फुले, श्री अमित वनारसे, श्री जयवंत पवार, श्री गणेश शिंदे, श्री नितिन विसापुरे, श्री विशाल निकम, श्री संजय शिंदे, श्री विकास पवार, श्री रणजित माने व इतर मान्यवर उपस्थित होते.