मनोज शेंडे मित्र समूहातर्फे वितरीत करण्यात येणाऱ्या अडीच हजार छत्र्यांचा लोकार्पण कार्यक्रम कास येथे पार पडला.
सातारा -सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. या पावसात गरिब, गरजू, निराधारांना पावसात भिजण्याची वेळ येते. त्यांची ही समस्या लक्षात घेवून सामाजिक बांधिलकेचा विचार करत या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे.
सातारा शहरातील गोर-गरीब, गरजू लोकांसाठी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे मित्र परिवाराच्यावतीने अडीच हजार छत्र्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब प्रेरणादायी आहे. गरजू लोकांना दिलेल्या छत्रीची किंमत पैशात मोजता येणार नाही. त्यामागे त्यांची तळमळ व भावना ही लाख मोलाची दिसून येत आहे. त्यांनी गरीबांप्रती दाखवलेल प्रेम व जिव्हाळा निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरला आहे.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्री.मनोज शेंडे, माजी नगराध्यक्ष सौ.रंजना रावत, सौ.सुजाता राजेमहाडिक, खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, श्री.पंकज चव्हाण, सौ.शिवानी कळसकर, माजी सभापती अनिता घोरपडे, माजी नगरसेवक श्री.वसंत लेवे, श्री.राम हदगे, श्री.राजू भोसले, श्री.सागर पावशे व आजी माजी नगसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.





