भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय !
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात ९ मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला गेला. भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेटच्या महामुकाबल्यात अखेर टीम इंडियाचा विजय झाला आहे.
भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ६ विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा मान पटकावला आहे. भारताचे सलग दुसरे आयसीसी स्पर्धा विजेतेपद असून यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.न्यूझीलंड टीम इंडियाला विजयासाठी २५२ धावांचं आव्हान दिलं होत. टीम इंडियाने ते आव्हान पेलवत ६ विकेट्स गमावून ४९ ओव्हरमध्ये पूर्ण केलं आहे. टीम इंडियाने २५४ धावा केल्या . त्याचबरोबर टीम इंडियाने या विजयासह न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा हिशेब चुकता केला म्हणायला आता काही हरकत नाही.
