अन्नत्याग आंदोलनावर बच्चू कडू ठाम
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर समाजघटकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी परिसरात त्यांनी 8 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अनेकांनी त्यांच्या आंदोलनला समर्थन दर्शवले आहे.
बच्चू कडू यांचे हे आंदोलन शेतकरी आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आहे. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि मोठ्या संख्येने समर्थकांच्या सहभागामुळे सरकारवर दबाव वाढत असून, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन राजकीयदृष्ट्या देखील महत्चाचे मानले जात आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी देखील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
