कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » ठळक बातम्या » स्पोर्ट्स » टीम इंडियाने इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावला; मँचेस्टर कसोटी ड्रॉ

टीम इंडियाने इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावला; मँचेस्टर कसोटी ड्रॉ

टीम इंडियाने इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावला; मँचेस्टर कसोटी ड्रॉ

मँचेस्टर- भारतीय संघ चौथा सामना गमावेल, असे इंग्लंडला कदाचित वाटले असेल. इंग्लंडचा संघ विजयाचे सेलिब्रेशन करण्यात गुंग होता. पण त्याचवेळी भारतीय संघाने इंग्लंडचे गर्वहरण केले आणि मँचेस्टरचा गड राखला. भारतावर यावेळी पराभवाची नामुष्की ओढवली होती. पण भारताने पाचव्या दिवशीही दिमाखदार खेळ केला आणि हा सामना ड्रॉ राखण्यात त्यांना यश आले. या सामन्यात गिलनंतर (१०३) रवींद्र जडेजा (नाबाद १०७) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद १००) यांनीही शतक झळकावत इंग्लंडला हतबल करून सोडले. भारताने ४ बाद ४२४ अशी धावसंख्या करत आपला डाव घोषित केला. इंग्लंडनेही यावेळी हार मानली.

इंग्लंडने या सामन्यात ६०० धावांचा पल्ला ओलांडला. भारतावरर ३११ धावांची आघाडीही घेतली होती. त्यानंतर इंग्लडने भारताने दोन फलंदाज शून्यावर बाद केले. त्यामुळे भारताचा चौथ्याच दिवशी पराभव होईल, असे म्हटले जात होते. पण त्यानंतर मैदानात शुभमन गिल आणि केएल राहुल समर्थपणे उभे राहीले. या दोघांनी चौथा दिवस खेळून काढला. पण त्यानंतरही पाचव्या दिवशी भारतीय संघावर पराभवाची टांगती तलवार होती. पण पाचव्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला उतरला आणि त्यावेळी एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. पाचव्या दिवशी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरला. तेव्हा भारतीय खेळाडूंचाा आत्मविश्वास चांगलाच दुणावला होता. राहुल आणि गिल यांनी दमदार फलंदाजी केली. 

राहुल शतकासमीप आला होता. पण राहुलला यावेळी शतक झळकावता आले नाही. राहुलने यावेळी ८ चौकारांच्या जोरावर ९० धावांची खेळी साकारली. राहुलला शतक झळकावता आले नसले तरी गिलने ही कसर भरून काढली. कारण गिलने यावेळी शतक झळकावत इतिहास रचला. गेल्या ३५ वर्षांत भारताचे या मैदानातील पहिले शतक ठरले. शतकानंतर गिलला जास्त फलंदाजी करता आली नाही. लंचला १० मिनिटे असताना तो बाद झाला. भारताला हा मोठा धक्का बसला होता, पण भारताला या गोष्टीची झळ जाणवली नाही. गिल बाद झाला तरी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढली. इंग्लंडचे गोलंदाज जडेजा आणि सुंदर यांच्यापुढे नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. पण जडेजा आणि सुंदर यांनी यावेळी दमदार फलंदाजी केली आणि भारताला सामना ड्रॉ राखण्यात सर्वात महत्वाची भूमिका या जोडीने बजावली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket