सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन
Home » राज्य » शेत शिवार » टोमॅटोचा भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल

टोमॅटोचा भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल

टोमॅटोचा भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल

सातारा -टोमॅटो पिकाचा बाजार मागील काही आठवड्यांपासून कमी झाला आहे. बाजारातील आवक वाढल्यानंतर भाव पडले. भाव पडल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोचा बाजारभाव अभावी लाल चिखल झाला आहे. भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

३० रुपये ते ७० रुपये २० किलोच्या प्रतिकॅरेटचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल टोमॅटो उत्पादकांमधून उपस्थित केला जात आहे.टोमॅटोचे पीक नगदी व भांडवली असल्याने लागवडीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च होतो. पण सध्या टोमॅटो पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून लाखो रुपये भांडवल घालून पोटच्या पोराप्रमाणे पिकलेली टोमॅटो शेती बाजारात कवडीमोल झाल्यामुळे शेवटी पिकाला विळा लावण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. टोमॅटोचे भाव घसरल्याने आर्थिक नुकसान होत आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये तीन दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याची सुरुवात नाशिक, दि. २८

Live Cricket