नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा

सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा

सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेऊन या कामांना गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

शहापूर, धोंडेवाडी, बाबरमाची येथील नागरी सुविधेंतर्गत 27 कामांच्या आढावा घेण्यात आला. पुनर्वसन अधिनियम 1999 तसेच महसूल व वन विभागाडील शासन निर्णयाप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे नागरी सुविधा देण्यात याव्यात. यावेळी त्यांनी पिण्याचे पाणी, शाळा, खेळाचे मैदान, ग्रामपंचायत कार्यालय, समाज मंदिरे, रस्ते, शेत जमिनीतून जाणारी पायवाट, वीज पुरवठा, गटारे, शौचालय, बस स्टॅन्ड, गोठे, दवाखाने, उद्याने, पोस्ट ऑफीस आदी सुविधांचा आढावा घेतला.

बाबरमाची येथील जी कामे प्रस्तावित आहेत त्यांना एक महिन्यात तांत्रिक मंजुरी घेऊन कामांना सुरुवात करावी. तसेच विद्युत वितरण कंपनीने या ठिकाणचे काम खर्चाच्या अंदाजपत्रकानुसारच करावे आणि येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

 वेळे ता. जावली येथील खातेदारांची शेत जमिनीचा सात बारा व नकाशा त्यांना जागेवर जावून वाटप करावयाचा आहे हे कामही येत्या एक महिन्यात पूर्ण करावे. तसेच येथील नागरी सुविधांच्या कामाची आचार संहिता संपल्यानंतर निवीदा प्रक्रिया राबवावी. 

 देऊर ता. जावली येथील भूखंड मोजणी, वाटप, शेती भूखंड याबाबत कार्यवाही प्रलंबित आहे हेही काम एक महिन्यात पूर्ण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.

या बैठकीमध्ये मौजे बोपेगाव, मळे व बहुले येथील पुनर्वसनाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. तसेच पाथारपुंज येथील पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. पाथारपुंजचा बंदी दिनांकाचा महत्वाचा विषय मार्गी लागला असून पुनर्वसनाला गती देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket