18 वर्षांचा दुष्काळ संपला! RCB ने आयपीएल ट्रॉफीवर कोरलं नाव, विराटचं स्वप्न पूर्ण
आयपीएल 2025 चा फायनल सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये पार पडला. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सवर धावांनी विजय मिळवून आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. यासह आरसीबीने त्यांचा आयपीएलमधील 18 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. आयपीएलमध्ये आरसीबीने पहिल्यांदाच विजेतेपदाचा मान मिळवला.
फायनल सामन्याचा टॉस पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकला. त्याने प्रथम गोलंदाजी निवडून आरसीबीला फलंदाजीचं आव्हान दिलं. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 190 धावा केल्या. तर पंजाबला आयपीएल विजयासाठी 191 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करण्यात पंजाब किंग्सला अपयश आलं. त्यामुळे आरसीबीचा 6 धावांनी विजय झाला. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सच्या 9 विकेट घेतल्या.
18वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आरसीबी संघाने आयपीएलमध्ये आपला पहिला ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्ज संघाचा पराभव केला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर 18 वर्षांचा आयपीएल ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा सामना केला, ज्यामध्ये त्यांनी 6 धावांनी सामना जिंकला आणि जेतेपद जिंकण्यात यश मिळवले. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 गडी गमावून 190 धावा केल्या, त्यानंतर पंजाब किंग्ज 20 षटकांत फक्त 184 धावाच करू शकले आणि पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
